शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

Kisan Long March : विरोधकांना दूर सारत मुख्यमंत्र्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:28 IST

शेतकरी आंदोलनाचे लाल वादळ मुंबईत दाखल झाल्यावर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेकरांना पाठिंबा जाहीर केला. शेतक-यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकार अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

गौरीशंकर घाळे मुंबई : शेतकरी आंदोलनाचे लाल वादळ मुंबईत दाखल झाल्यावर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेकरांना पाठिंबा जाहीर केला. शेतक-यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकार अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिताफीने वाटाघाटी करत विरोधकांच्या मनसुब्यांना चांगलाच धक्का दिला.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंतरावर ठेवत मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकरी नेत्यांशी वाटाघाटी केल्या. शेतकºयांच्यामागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतनाच अंमलबजावणीसाठी आवश्यक अवधीही पदरात पाडून घेतला. या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधकांकडे आयती संधी चालून आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या खेळीने विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ सोमवारी दुपारी एक वाजता विधान भवनात दाखल झाले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र खोलीत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये सुमारे एक तास बैठक चालली. इतका वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मात्र बाहेर ताटकळत उभे होते. जेव्हा या नेत्यांना बैठकीस बोलावण्यात आले तोपर्यंत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळात समझोता झाला होता. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर काही अटींवर मोर्चा मागे घेण्याचीही तयारी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाने मॅच आधीच फिक्स केली होती, अशी भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. विरोधी नेतेच नव्हे तर ज्येष्ठ मंत्रीही बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे हा सारा मामला फिक्स होता की काय? अशी शंका घ्यायला वाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी बाकांवरील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या अँटी चेंबरमध्ये ही खलबते झाली. यात किसान सभेचे नेते अजित नवले, अशोक ढवळे, माजी आमदार आणि सीपीआयचे नेते नरसय्या आडम, शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आदी नेत्यांना मात्र बाहेर ताटकळत थांबावे लागले होते.तर, नाशिकपासून सुरु झालेल्या या मोर्चाने सरकारविरोधात वातावरण बनविण्यात यश मिळविले होते.या मार्चमुळे सरकारवर दबावही वाढला होता. आंदोलकांनी रस्त्यावरची लढाई जिंकली. पण, वाटाघाटीत मात्र ते पराभूत झाले, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. त्यामुळे या मार्चबद्दल विविध प्रतिक्रिया उमटल्या.राज्य सरकारच्या कर्जमाफीबद्दल विरोधकांनी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येत्या सहा महिन्यांत वनजमिनींचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने आंदोलकांना दिले आहे. त्यावर आंदोलकांचे समाधान झाल्याचे चित्र आहे.आम्ही आंदोलना पाठिंबा दिला असला तरी आम्ही काही आयोजक नाही. कदाचित आंदोलकांचे नेते सरकारच्या आश्वासनावर समाधानी असावेत, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस