शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पुरोगामी महाराष्ट्रासाठी किरवलेंची हत्त्या वेदनादायी

By admin | Updated: March 7, 2017 21:58 IST

ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे

नाशिक : संशोधक, समीक्षक व कार्यकर्ता असे व्यक्तीमत्व असलेले कोल्हापूरचे डॉक़ृष्णा किरवले यांची हत्त्या ही पुरोगामी महाराष्ट्राला वेदना देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले़ हुतात्मा स्मारकात मंगळवारी (दि़७) आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते़ कसबे यांनी सांगितले की, डॉ़किरवले हे त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनचे माझे कौटुंबिक मित्र होते़ त्यांचा अस्मितादर्श या नियतकालिकातील निष्ठेचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे़ ते एक संशोधक, समीक्षक आणि कार्यकर्ता असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आंबेडकर चळवळीत अधोरेखित आहे़ साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते विचारवंत डॉ़किरवले यांच्या हत्त्येमुळे पुरोगामी आणि विवेकवादी महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली आहे़प्राग़ंगाधर अहिरे यांनी सांगितले की, डॉक़ृष्णा किरवले यांनी आंबेडकरी शाहिरीवर केलेले संशोधन मूलगामी ठरलेले आहे़ समग्र बाबुराव बागूल या त्यांच्या ग्रंथामुळे आंबेडकरी विचारविश्व मराठी वाडगमयाच्या क्षेत्रात अधोरेखित झालेले आहे़ त्यांनी दलित साहित्यातील लोकप्रवाह याची चिंतनातून मांडणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना दलित साहित्यातील विविध प्रवाहांचे आकलन होणे सोयीचे झाले आहे़ ते केवळ साहित्यिक नव्हते तर कार्यकर्ता लेखक म्हणून पुरोगामी चळवळीत सर्वदूर परिचित होतेक़वि किशोर पाठक यांनी किरवले यांच्या हत्त्येमुळे मराठी साहित्याला उर्जा देणारा एक विचारवंत हरपल्याचे सांगितले़यावेळी डॉ़शंकर बोराडे, डॉ़संजय जाधव, राजू देसले, श्रीकांत बेणी, डॉ़धीरज झाल्टे, प्रा़महादेव कांबळे, राकेश वानखेडे आदींनी आपल्या भावना प्रकट केल्या़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भुजबळ यांनी तर शोकसभेचे आयोजन अ‍ॅड़अशोक बनसोडे, चंद्रकांत गायकवाड, अ‍ॅड़अरुण दोंदे यांनी केले होते़ फोटो :- ०७पीएचएमआर ११९डॉक़ृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थित डॉ़रावसाहेब कसबे़ समवेत किशोर पाठक, गंगाधर अहिरे़