शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसण्याची भीती, नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 07:00 IST

माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणूक होते. पण त्यामुळे सर्व जिवंत कला प्रकारांवर आक्रमण झाल्याने नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसट तर होणार नाही ना, याची भीती वाटते.

मुंबई : माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणूक होते. पण त्यामुळे सर्व जिवंत कला प्रकारांवर आक्रमण झाल्याने नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसट तर होणार नाही ना, याची भीती वाटते. नाट्य व्यवसायावरील आक्रमणे रोखायची असतील; तर नाट्य परिषद, राज्य सरकार, कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी बुधवारी केले.ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद््घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते. स्वागताध्यक्ष विनोद तावडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते शिलेदार यांनी सूत्रे स्वीकारली.नाट्यव्यवसाय पूर्वी परस्परांच्या सहकार्याने चालत होता. अन्य माध्यमांबरोबर नाटकात काम करणाऱ्या सेलिब्रिटी कलाकारांमुळे निर्माते अडचणीत आले. वेगवेगळ््या माध्यमांचे या व्यवसायावर आक्रमण सुरू आहे. त्यातून प्रेक्षकांना भुर्दंड बसेल. बालरंगभूमी सशक्त करायची असेल, तर शालेय शिक्षणातच नाटक या विषयाचा समावेश करायला हवा, असे शिलेदार म्हणाल्या.नाटक मोठे होण्यासाठी बालरंगभूमीचा पाया मजबूत करण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. आजच्या बालरंगभूमीवर उद्याची प्रायोगिक रंगभूमी अवलंबून असते, तर उद्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर भविष्याची व्यावसायिक रंगभूमी अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.मराठी नाटकात भव्यता यायला हवी, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याला पवार यांनी दुजोरा दिला. मराठी नाट्यसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. नवीन कलाकार आणि थिएटरचा दर्जा यांसह कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीकडेही नाट्य परिषदेने लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यासाठी शासकीय किंवा सामाजिक संस्थांच्या मदतीची गरज नाही. मराठी रसिक त्यासाठी सक्षम आहे. मात्र त्यासाठी नाटकाचे आशय आणि विषय यामधील कमतरता दूर करण्याची आवश्यकता आहे. नाटकांना गतीमानता देण्यासाठी रसिक पैशांकडे बघणार नाहीत, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.नाटक हा मराठी माणसांच्या जिव्हाळ््याचा विषय आहे. मात्र नाट्यक्षेत्रात काही चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत, त्या बाजूला सारून नाटक मोठे व्हायला हवे, अशी सूचना राज ठाकरे यांनी नाट्य परिषदेला केली. मराठी माणसाला चित्रपट किंवा टीव्ही मालिकांहून अधिक वेड नाटकाचे आहे. मात्र तरीही नाटके चालत नाहीत. नाट्यक्षेत्रात थिएटर्सच्या तारखा विकल्या जात असल्याचे समजले. नाटक विकण्याऐवजी तारखा विकून पोट भरण्याइतके दुर्दैव नाही. हे रोखण्यासाठी नाटकावर प्रेम असलेल्यांनी आणि कलावंतांनी नाटक अधिक चांगले कसे होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. भव्यता आणि संहिता एकत्र आल्या, तरच मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळतील. त्यासाठी तिकीटाचे दर वाढवावे लागले, तरी चालेल असा सल्लाही त्यांनी दिला. थिएटर्समधील बाथरूमपेक्षा नाटकाचा विषय अधिक महत्त्वाचा आहे, हे आवर्जून सांगताना ठाकरे यांनी खास शैलीत आंब्याच्या विषयावरून संभाजी भिडेंचाही उल्लेख केला. 

टॅग्स :98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनMumbaiमुंबई