शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

‘किंगमेकर’ कोण ?

By admin | Updated: October 31, 2015 00:33 IST

महापालिका निवडणूक : अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला

विश्वास पाटील - कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेच्या सारीपाटात किंगमेकर कोण होणार, याबद्दलची लोकांत चर्चा आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकीय बळ ठरविणारी ही निवडणूक आहे.महापालिकेच्या रणांगणात या पाच नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व ताराराणी आघाडी रिंंगणात उतरली आहे. काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्या जोडीला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचाही प्रचारात सक्रिय सहभाग राहिला; परंतु त्यांच्या विधानसभेच्या राजकारणावर महापालिका निवडणुकीचा फारसा परिणाम होत नाही. तसे सतेज पाटील यांच्याबाबतीत नाही. महापालिकेतील यशापयश हे त्यांच्या विधानसभेच्या लढतीवरही परिणाम करणारे आहे. त्या अर्थाने विधानसभेवेळी त्यांच्यापासून दुरावलेला मतदार त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करणार का, याचाही फैसला या निवडणुकीने होणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून येतात व कसबा बावड्याचा गड सतेज पाटील शाबूत राखतात का, हेदेखील या निवडणुकीत तितकेच महत्त्वाचे आहे.राष्ट्रवादीचे नेते आमदार मुश्रीफ यांच्या विधानसभेला या निवडणुकीचा काही फायदा-तोटा नाही; परंतु पक्षातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील राष्ट्रवादीचे वर्तमान आणि भवितव्यही मुश्रीफच राहतील का, याचा निर्णय देणारी ही निवडणूक आहे. खासदार धनंजय महाडिक या निवडणुकीत पक्षापासून थेट बाजूला गेल्यामुळे पुढच्या लोकसभेवेळी ते राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील का, याबद्दलही राष्ट्रवादीतच साशंकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे या निवडणुकीतील जे काही यश असेल ते एकट्या मुश्रीफ यांच्याच प्रयत्नांचे असेल.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा तर सगळ्यात जास्त पणाला लागली आहे; कारण भाजपची शहरात फारशी चांगली संघटनात्मक बांधणी झाली नसताना तीन जागांवरून त्यांना तीस जागांपर्यंत झेप घ्यायची आहे. भाजपला ज्या जागा मिळतील, त्याचे पक्षाच्या राज्याच्या राजकारणावरही पडसाद उमटणार आहेत. पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. कोल्हापुरात भाजप व शिवसेनेत जी झोंबाझोंबी झाली, त्याचा परिणाम तेथील निवडणुकीवरही होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी दादांना ‘काही झाले तरी शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त आली पाहिजे,’ असे बजावले असल्याने चंद्रकांतदादा यांचाही चांगलाच कस लागणार आहे. दादा त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात प्रथमच कोल्हापूरच्या गल्ली-बोळांतून पळताना दिसले.आमदार महाडिक हे आपला ताराराणी आघाडीशी काही संबंध नाही, असे वारंवार सांगत असले तरी ‘ताराराणी’चे यशापयश हे अमल किंवा स्वरूप यांच्यापेक्षा ते महादेवराव महाडिक यांच्या राजकीय कर्तृत्वाची फूटपट्टी म्हणूनच पाहिले जाणार आहे. म्हणून तर सगळ्या प्रचारात त्यांच्या विरोधातील सर्वच पक्षांनी अमल, स्वरूप किंवा धनंजय महाडिक यांच्यावर फारशी टीकाच केली नाही. जी काही टीका झाली ती पूर्णत: महादेवराव महाडिक यांच्यावरच. त्याशिवाय ‘ताराराणी’चे नाणे किती चालते यावर महादेवराव महाडिक यांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे भवितव्यही ठरणार आहे. अगोदरच त्यांनी काँग्रेसला अंगावर घेतले. या निवडणुकीत भाजपला मित्र केले; परंतु राष्ट्रवादी व मुश्रीफ त्यांचे शत्रू झाले. त्यामुळे एवढे होऊनही त्यांना चांगले यश मिळाल्यास त्यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे.पालकमंत्री पाटील यांच्या इतकीच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याही राजकीय भवितव्यावर परिणाम करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन एकट्यानेच किल्ला लढविला. त्यामुळे शिवसेनेला जे काही यश मिळेल त्यावरून क्षीरसागर यांचा शहराच्या राजकारणावर किती प्रभाव आहे, याचा मेळ घातला जाईल. या निवडणुकीने त्यांचे भाजपबरोबरचे शत्रुत्व आणखी वाढले. त्याचेही परिणाम कोल्हापूर ‘उत्तर’च्या राजकारणावर होणार आहेत.