शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

By admin | Updated: January 8, 2015 00:05 IST

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे.

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे. हा आनंद का होतोय, याचे भान नाही. आपला हा उगाचच कशातही आनंद वाटावा. दानवे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. मंत्री होऊन उणे-पुरे सहा महिने झाले नाहीत तोच त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आणले गेले. वास्तविक दोन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बनले, त्याच वेळी दानवे यांचेही नाव होते आणि ते स्वत: उत्सुकही होते. दानवे हे गेल्या तीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. विधानसभा आणि लोकसभा असा प्रतिनिधी म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे. साखर कारखानदारीचा अभ्यास आहे. अवघड परिस्थितीत साखर कारखाना चालविण्याचा अनुभव आहे. शिवाय ते कोणत्याही वादात सहसा अडकत नाहीत. असे असताना त्यांना वरून खाली पाठविणे ही काही २ + २ = ४ अशी सरळ प्रक्रिया नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना काम करणारी अभ्यासू, धडाडीची आणि दृष्टी असणारी माणसे हवी आहेत आणि नेमका त्याचा दुष्काळ भाजपाकडे दिसतो. म्हणूनच मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभंूसारखी माणसे त्यांनी उचलली. दानवे हे त्या चौकटीत बसणारे ‘स्मार्ट’ नाहीत की त्यांच्याकडे शोमनशिप नाही. मराठवाड्याचा रांगडा गडी असेच म्हणता येईल. दिल्लीच्या दरबारी राजकारणाचे रीतीरिवाज कळत नसतील, फर्डे इंग्रजी बोलता येत नसेल; पण मंत्रीपदाची ही काही पात्रता नाही. तसे पाहिले तर हिंदुत्ववादाची मुक्ताफळे उधळणाऱ्या साध्वी निरंजना ज्योती यांच्यासारखी बरीच मंडळी मंत्रिमंडळात आहेत. दानवेंना प्रदेशाध्यक्ष केल्यास केंद्रात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व कोण करणार, हा प्रश्नच आहे. दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात, शिवाय संसदीय कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन या भागाच्या विकासाला ते गतिमान करू शकतात. त्यांचे मंत्रिमंडळातून जाणे ही गोष्ट मराठवाड्यासाठी फायद्याची निश्चित नाही.भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांना देण्याचा घाट घालण्यात आला; पण त्यामुळे या प्रदेशाचे काय भले होणार? केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे. विरोधी पक्ष असणारा काँग्रेस मरगळ आणि निराशेतून अवसान गमावून बसलेला दिसतो. राष्ट्रवादी पक्षाची अवस्था लकवा झाल्यासारखी आहे. म्हणजे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांसमोर कोणतेही आव्हान नाही. सध्या हे पद बिनकामाचे आहे आणि ते मराठवाड्याच्या माथी मारले जाते. आठवड्यात पैठण तालुक्यातील केकतजळगावच्या हनुमंत बनकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणारा हनुमंत हा काही मराठवाड्यातील पहिला शेतकरी नाही. गेल्या वर्षभरातच ५११ आत्महत्या झाल्या, याचा अर्थ समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या असेच म्हणावे लागेल. मराठवाडा दुष्काळी, पाण्याची टंचाई कायमची; पण गेली तीन वर्षे नापिकीने पाठ सोडली नाही. ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशा अवस्थेत मराठवाडा सापडला. दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाने काही पिकले नाही, गेल्या वर्षी अतिवृष्टीत सगळे मातीमोल झाले आणि यावर्षी पावसाने पाठ फिरविली. म्हणजे ये रे माझ्या मागल्या. याचाच परिपाक म्हणजे सरत्या २०१४ या वर्षात ५११ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. ज्या हनुमंतचा उल्लेख केला, त्याची कहाणी कमी-अधिक फरकाने या सर्वांसारखीच. हनुमंतला विहिरीसाठी ‘मनरेगा’तून १ लाख ९० हजार रुपये शेतात विहिरीसाठी मंजूर झाले होते. पैसे मिळण्यापूर्वी त्याने उधार-उसनवार करून विहीर खोदली; पण मंजूर झालेले पैसे मिळाले नाहीत. इकडे देणेकऱ्यांनी तगादा लावला. मंजूर पैसे देण्यासाठी सरकारी यंत्रणा हलली नाही. शेवट त्याने स्वत:ला संपविण्यात केला. पैठण तालुक्यात ‘रोहयो’च्या कामाचे ७०० कोटी रुपये वाटप व्हायचे आहेत, अशी कबुली प्रशासनच देते. कामे झाली; पण पैसेच दिले नाहीत.या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये झालेल्या ३२ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या अध्यक्षीय भाषणातील उदय प्रकाश यांच्या कवितेतील उद्धृत केलेल्या ओळी समर्पक आहेत. ते म्हणतात -आदमी मरने के बादकुछ नहीं बोलता हैंआदमी मरने के बादकुछ नहीं सोचता हैंकुछ ना बोलनेकुछ ना सोचने सेआदमी मर जाता हैं ।।- सुधीर महाजन