शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

By admin | Updated: January 8, 2015 00:05 IST

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे.

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे. हा आनंद का होतोय, याचे भान नाही. आपला हा उगाचच कशातही आनंद वाटावा. दानवे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. मंत्री होऊन उणे-पुरे सहा महिने झाले नाहीत तोच त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आणले गेले. वास्तविक दोन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बनले, त्याच वेळी दानवे यांचेही नाव होते आणि ते स्वत: उत्सुकही होते. दानवे हे गेल्या तीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. विधानसभा आणि लोकसभा असा प्रतिनिधी म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे. साखर कारखानदारीचा अभ्यास आहे. अवघड परिस्थितीत साखर कारखाना चालविण्याचा अनुभव आहे. शिवाय ते कोणत्याही वादात सहसा अडकत नाहीत. असे असताना त्यांना वरून खाली पाठविणे ही काही २ + २ = ४ अशी सरळ प्रक्रिया नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना काम करणारी अभ्यासू, धडाडीची आणि दृष्टी असणारी माणसे हवी आहेत आणि नेमका त्याचा दुष्काळ भाजपाकडे दिसतो. म्हणूनच मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभंूसारखी माणसे त्यांनी उचलली. दानवे हे त्या चौकटीत बसणारे ‘स्मार्ट’ नाहीत की त्यांच्याकडे शोमनशिप नाही. मराठवाड्याचा रांगडा गडी असेच म्हणता येईल. दिल्लीच्या दरबारी राजकारणाचे रीतीरिवाज कळत नसतील, फर्डे इंग्रजी बोलता येत नसेल; पण मंत्रीपदाची ही काही पात्रता नाही. तसे पाहिले तर हिंदुत्ववादाची मुक्ताफळे उधळणाऱ्या साध्वी निरंजना ज्योती यांच्यासारखी बरीच मंडळी मंत्रिमंडळात आहेत. दानवेंना प्रदेशाध्यक्ष केल्यास केंद्रात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व कोण करणार, हा प्रश्नच आहे. दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात, शिवाय संसदीय कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन या भागाच्या विकासाला ते गतिमान करू शकतात. त्यांचे मंत्रिमंडळातून जाणे ही गोष्ट मराठवाड्यासाठी फायद्याची निश्चित नाही.भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांना देण्याचा घाट घालण्यात आला; पण त्यामुळे या प्रदेशाचे काय भले होणार? केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे. विरोधी पक्ष असणारा काँग्रेस मरगळ आणि निराशेतून अवसान गमावून बसलेला दिसतो. राष्ट्रवादी पक्षाची अवस्था लकवा झाल्यासारखी आहे. म्हणजे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांसमोर कोणतेही आव्हान नाही. सध्या हे पद बिनकामाचे आहे आणि ते मराठवाड्याच्या माथी मारले जाते. आठवड्यात पैठण तालुक्यातील केकतजळगावच्या हनुमंत बनकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणारा हनुमंत हा काही मराठवाड्यातील पहिला शेतकरी नाही. गेल्या वर्षभरातच ५११ आत्महत्या झाल्या, याचा अर्थ समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या असेच म्हणावे लागेल. मराठवाडा दुष्काळी, पाण्याची टंचाई कायमची; पण गेली तीन वर्षे नापिकीने पाठ सोडली नाही. ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशा अवस्थेत मराठवाडा सापडला. दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाने काही पिकले नाही, गेल्या वर्षी अतिवृष्टीत सगळे मातीमोल झाले आणि यावर्षी पावसाने पाठ फिरविली. म्हणजे ये रे माझ्या मागल्या. याचाच परिपाक म्हणजे सरत्या २०१४ या वर्षात ५११ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. ज्या हनुमंतचा उल्लेख केला, त्याची कहाणी कमी-अधिक फरकाने या सर्वांसारखीच. हनुमंतला विहिरीसाठी ‘मनरेगा’तून १ लाख ९० हजार रुपये शेतात विहिरीसाठी मंजूर झाले होते. पैसे मिळण्यापूर्वी त्याने उधार-उसनवार करून विहीर खोदली; पण मंजूर झालेले पैसे मिळाले नाहीत. इकडे देणेकऱ्यांनी तगादा लावला. मंजूर पैसे देण्यासाठी सरकारी यंत्रणा हलली नाही. शेवट त्याने स्वत:ला संपविण्यात केला. पैठण तालुक्यात ‘रोहयो’च्या कामाचे ७०० कोटी रुपये वाटप व्हायचे आहेत, अशी कबुली प्रशासनच देते. कामे झाली; पण पैसेच दिले नाहीत.या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये झालेल्या ३२ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या अध्यक्षीय भाषणातील उदय प्रकाश यांच्या कवितेतील उद्धृत केलेल्या ओळी समर्पक आहेत. ते म्हणतात -आदमी मरने के बादकुछ नहीं बोलता हैंआदमी मरने के बादकुछ नहीं सोचता हैंकुछ ना बोलनेकुछ ना सोचने सेआदमी मर जाता हैं ।।- सुधीर महाजन