शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘कार्बाइड’वर पिकतो फळांचा राजा !

By admin | Updated: April 21, 2015 01:20 IST

अक्षयतृतीयेपासून आमरस चाखण्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात फळांच्या राजाची मागणी एकदम वाढत असल्याने कार्बाइडचा वापर करून आंबा पिकविला जात

लक्ष्मण मोरे, पुणेअक्षयतृतीयेपासून आमरस चाखण्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात फळांच्या राजाची मागणी एकदम वाढत असल्याने कार्बाइडचा वापर करून आंबा पिकविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळबाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर आंबा पेट्यांच्या हंड्या लावलेल्या आहेत. गोणपाटांनी झाकलेल्या या पेट्यांचे ढीगच्या ढीग येथे पाहायला मिळतात. या पेट्यांमध्ये कार्बाइड पावडरच्या पुड्या टाकल्या जातात. कार्बाइड पावडरमुळे उष्णता निर्माण होऊन आंबा लवकर पिकतो. हाच आंबा फळ विक्रेत्यांमार्फत घराघरात जातो. आवडीने खाल्ला जाणारा हा आंबा नैसर्गिकरीत्या नव्हे, तर कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आल्याची लोकांना कल्पनाही नसते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सोमवारी बाजार समितीमधील काही गाळ्यांवर फिरून गोणपाटाची पोती लावून उभारलेल्या हंड्या पाहिल्या. त्याचे छायाचित्रणही केले. त्यात काही गाळ्यांच्या बाहेर मात्र कार्बाइडच्या खाकी रंगातल्या पुड्या आढळल्या. काही गाळ्यांच्या पोट माळ्यावर अशाप्रकारे आंबा पिकवण्याचा प्रकार सुरू होता. केळी बाजारामधील गाळ्यांबाहेरही कार्बाइडच्या पुड्या आढळल्या.