शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोन तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:56 IST

सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर, त्यांना बीअर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर, त्यांना बीअर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या दोन तरुणांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्या तिसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरणानंतर घरी परतलेल्या एका मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, १४ तासांमध्ये उर्वरित दोघींची सुखरूपपणे सुटका केली.सौरभ आबोरे (१८) आणि खलील खान (१९) या दोघांनाही अटक केली असून, त्यांचा तिसरा साथीदार सूरज (१६) (नावात बदल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही कासारवडवली, ओवळा भागातील रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी खलीलची सिद्धेश्वर तलाव भागातील शिवांगी (१६, नावात बदल) या मुलीशी अलीकडेच ओळख झाली होती. त्याने धीरज आणि सौरभ या अन्य दोन मित्रांशी तिच्या १३ आणि १६ वर्षांच्या अन्य मैत्रिणींशी ओळख घडवून आणली. गेल्या १५ दिवसांतच मैत्री झाल्यानंतर, या तीन मुलांनी त्यांना १७ जुलै रोजी सौरभच्या घरी पार्टी करण्याचे आमिष दाखविले. रात्री ११ पर्यंत परत येण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याने मुलींनीही तयारी दर्शवली. त्यांना दुचाकीवरून घेऊन हे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ओवळा येथील घरी गेले. तिथे त्यांनी पार्टी केली, जेवण केले. मुलींना आग्रह करून बीअरही पाजली. रात्री ९.३० ते पहाटे ४.३० पर्यंत नृत्य करून, त्यांच्याशी गैरवर्तनही केले. नशेत असल्यामुळे या मुलींनाही कसलेच भान राहिले नाही. इकडे पालकांनी रात्री ११ पर्यंत मुली घरी न परतल्यामुळे, नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांचे मित्र, मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली. त्यांचे मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अकाउंटही तपासले. दरम्यान, १८ जुलै रोजी तिघींपैकी एक १३ वर्षांची मुलगी पहाटेच्या सुमारास घरी परतली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन रात्रभर कुठे होतीस, याची चौकशी केली. तेव्हा या ‘पार्टी’ प्रकरणाचा उलगडा झाला. तोपर्यंत या आरोपींनी अन्य मुलींना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान उपवन परिसरात नेले. सकाळी ६ पोलिसांनी सौरभचे घर गाठले. घरात त्यांना आक्षेपार्ह साधनांसह दारूच्या बाटल्याही मिळाल्या, पण या मुली मिळाल्या नाही. त्यांचे मोबाइल बंद असतानाही टॉवर लोकेशन घेऊन, पोलिसांनी सकाळी ९.३० वाजता उपवन भागातून ताब्यात घेतले. रात्री ८.३० च्या सुमारास सौरभ आणि खलील यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सूरजला बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि पोक्सो - ८ (अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे, तसेच गैरवर्तन) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.आईच्या भीतीने ती परतली...मुलांच्या आग्रहाखातर दोघी १६ वर्षीय मुलींनी बीअरचे काही घोट घेतले, तर तिसऱ्या १३ वर्षीय मुलीने मात्र ते घेण्यात बरीच टाळाटाळ केली. तिचे वडील रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. ते परत येतील आणि आईदेखील रागावेल, म्हणून तिने पहाटेच घर गाठले आणि त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.दहावी, बारावीतील मुलींनी काळजीपूर्वक मोबाइलचा वापर करावा. बऱ्याचदा फ्रेंडशिपच्या नावाखाली मुलींना फसविले जाते. त्यामुळे पालकांनी किशोरवयीन मुलामुलींवर लक्ष ठेवावे.- संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक