शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

खेडनजीकची गावे सेझमुक्त, राजू शेट्टींनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:35 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.निमित्त होते, राजगुरूनगर-खेडमधील निमगाव, कणेरसर, दाडी व केंदूर ही या चार गावांशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे. ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, खेडमधील या सेझचा अभ्यास केला असता, शेतकºयांवर अन्याय आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांना न्याय मिळवून दिला पाहिजे, या विचाराने सेझ रद्द केला. संघर्षाच्या वेळी संघर्ष आणि त्याला यश आल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचे असे क्षण विरळेच येतात, असे नमूद करून, खेड परिसरातील या शेतकºयांना विकासासाठी नेहमीच पाठबळ दिले जाईल, असाही विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला.खा. शेट्टी म्हणाले, सेझ रद्द करून आणि त्यानंतर जमीन हस्तांतरण शुल्क माफ करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी आणि रास्त भूमिका घेतली आहे.शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना खेडमध्ये होणाºया कृतज्ञता मेळाव्यासाठीचे निमंत्रणही दिले.राजगुरूनगर- खेड मधील या चार गावांतील सुमारे बाराशे पन्नास हेक्टर जमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. करारानुसार १५ टक्के जमिनी परतावा स्वरूपात प्रकल्प बाधितांना परत देण्यास मान्यता देण्यात आली होती, पण या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क म्हणून २३ कोटी द्यावे लागणार होते. हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमिनींच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.या शिष्टमंडळात अ‍ॅड. योगेश पांडे, यांच्यासह काशिनाथ दौंडकर, विष्णू दौंडकर, मारुती होर्डे, राजाराम होर्डे, राहुल सातपुते आदींचा समावेश होता.