शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरीप धोक्यात!

By admin | Updated: June 30, 2016 01:37 IST

या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे.

पुणे : या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आजपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.हवामान विभागाने वेळोवेळी वर्तवलेल्या आंदाजानुसार चांगला पाऊस या वर्षी पडेल, असे सांगितले गेले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. कृषी विभागानेही तयारी करून तालुक्यानुसार बैैठका घेऊन नियोजन सांगितले. मात्र, गेला महिनाभर पाऊस हुलकावणीच देत आहे. सुरुवातीला भात उत्पादकांनी धूळवाफेवर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच येत नसल्याने त्या वाया जातात की काय, असा पेच निर्माण झाला होता. पण, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काहीसा पाऊस झाल्याने त्या पेरण्या वाचल्या. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी पेरण्या कराव्या की नाही, अशा विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी तो २२७.२१ मिलिमीटर झाला होता. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाला निम्मी सरासरी गाठता आली नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)पाऊस हुलकावणी देत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत उसासह फक्त ४.३७ टक्के इतक्यात क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.सर्वाधिक पाऊस इंदापूरला१ जून पासून जिल्ह्यात आतापर्र्यत सर्वाधिक पाउस इंदापूर तालुक्यात झाला असून तो १५७.७0 मिलीमीटर इतका आहे. तर त्यानतर वेल्हे तालुक्यात १0८.७0, मुळशी तालुक्यात १0८.७0 तर मावळ तालुक्यात १0५.३0 मिलीमीटर इतका पाउस झाला आहे. तर सर्वात कमी हवेलीत २७.१0 तर आंबेगावमध्ये ३६.९0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भात उत्पादक चिंतेतखरीप हंगामात भात हे पीक सर्वाधिक सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. या वर्षीच्या नियोजनात ५५ हजार हेक्टरवर ते घेण्याचे ठरविले होते. जून महिन्यात भाताचा जवळपास १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतात; मात्र या वर्षी सरासरीच्या फक्त ७२९.५ हेक्टरवरच पेरण्या झाल्या असून, ती टक्केवारी ४.८ इतकीच आहे. पावसाची कृपा झाली नाही, तर यंदा भात उत्पादकांवरही संकट येण्याची शक्यता आहे.