शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

खरीपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण

By admin | Updated: August 18, 2016 03:12 IST

यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले

पुणे : यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा उंचवल्या आहेत.राज्यात खरीपाचे एकूण १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत तब्बल १४१.२० लाख हेक्टर (१०१ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जून अखेरपर्यंत केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. परंतु, एक जुलैपासूनच संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाल्याने शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे जोमाने सुरु असून, अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. बाजरी, मुग, उडीद आणि भुईमूग पिक वाढीच्या आवस्थेत असून, फुलोरा धरला आहे. परंतु, राज्यात काही भागात सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले असून, कडधान्य पिक पिवळी पडू लागली आहेत.राज्यात कोकण विभागात ४.८७ लाख हेक्टर क्षेत्र खरीपाखाली असून, आतापर्यंत ४.०१ लाख हेक्टर म्हणजे ८२ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कोकण विभागामध्ये भात आणि नाचणीची पुनर्लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक विभागामध्ये आता पर्यंत ९७ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.येथे मुग व उडिद पिकांची स्थिती चांगली आहे. जळगांव जिल्ह्यात अति पावसामुळे पिके काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. पुणे विभागामध्ये ७.३९ लाख हेक्टर क्षेत्र खरीपा खाली असताना चांगल्या पावसामुळे १०.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १४० टक्के पेरण्या झाल्या आहेत.कोल्हापूर विभागामध्ये १०८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, तूर व सूर्यफुल पिकांची वाढ चांगली आहे. दरम्यान सोयाबिन पिकावर केसाळ अळी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)