शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खरीपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण

By admin | Updated: August 18, 2016 03:12 IST

यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले

पुणे : यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा उंचवल्या आहेत.राज्यात खरीपाचे एकूण १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत तब्बल १४१.२० लाख हेक्टर (१०१ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जून अखेरपर्यंत केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. परंतु, एक जुलैपासूनच संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाल्याने शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे जोमाने सुरु असून, अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. बाजरी, मुग, उडीद आणि भुईमूग पिक वाढीच्या आवस्थेत असून, फुलोरा धरला आहे. परंतु, राज्यात काही भागात सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले असून, कडधान्य पिक पिवळी पडू लागली आहेत.राज्यात कोकण विभागात ४.८७ लाख हेक्टर क्षेत्र खरीपाखाली असून, आतापर्यंत ४.०१ लाख हेक्टर म्हणजे ८२ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कोकण विभागामध्ये भात आणि नाचणीची पुनर्लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक विभागामध्ये आता पर्यंत ९७ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.येथे मुग व उडिद पिकांची स्थिती चांगली आहे. जळगांव जिल्ह्यात अति पावसामुळे पिके काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. पुणे विभागामध्ये ७.३९ लाख हेक्टर क्षेत्र खरीपा खाली असताना चांगल्या पावसामुळे १०.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १४० टक्के पेरण्या झाल्या आहेत.कोल्हापूर विभागामध्ये १०८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, तूर व सूर्यफुल पिकांची वाढ चांगली आहे. दरम्यान सोयाबिन पिकावर केसाळ अळी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)