शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

खरीपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण

By admin | Updated: August 18, 2016 03:12 IST

यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले

पुणे : यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा उंचवल्या आहेत.राज्यात खरीपाचे एकूण १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत तब्बल १४१.२० लाख हेक्टर (१०१ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जून अखेरपर्यंत केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. परंतु, एक जुलैपासूनच संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाल्याने शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे जोमाने सुरु असून, अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. बाजरी, मुग, उडीद आणि भुईमूग पिक वाढीच्या आवस्थेत असून, फुलोरा धरला आहे. परंतु, राज्यात काही भागात सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले असून, कडधान्य पिक पिवळी पडू लागली आहेत.राज्यात कोकण विभागात ४.८७ लाख हेक्टर क्षेत्र खरीपाखाली असून, आतापर्यंत ४.०१ लाख हेक्टर म्हणजे ८२ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कोकण विभागामध्ये भात आणि नाचणीची पुनर्लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक विभागामध्ये आता पर्यंत ९७ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.येथे मुग व उडिद पिकांची स्थिती चांगली आहे. जळगांव जिल्ह्यात अति पावसामुळे पिके काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. पुणे विभागामध्ये ७.३९ लाख हेक्टर क्षेत्र खरीपा खाली असताना चांगल्या पावसामुळे १०.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १४० टक्के पेरण्या झाल्या आहेत.कोल्हापूर विभागामध्ये १०८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, तूर व सूर्यफुल पिकांची वाढ चांगली आहे. दरम्यान सोयाबिन पिकावर केसाळ अळी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)