शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

खरिपातील पिकांचे हमीदर ठरणार फेब्रुवारीत!

By admin | Updated: August 23, 2016 20:13 IST

चालू खरीप हंगामातील शेतमालाचे हमीदर पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार असल्याचे वृत्त आहे.

रजरत्न सिरसाट / ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २३ - चालू खरीप हंगामातील शेतमालाचे हमीदर पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार असल्याचे वृत्त आहे. याकरिता उत्पादन खर्चाचा आराखडा राज्य शासनाला पाठविण्यासाठीचे नियोजन राज्यातील कृषी विद्यापीठांनी सुरू केले आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह पणन तज्ज्ञांनी काढलेल्या खरीप हंगामातील पीक उत्पादन खर्चाची माहिती दरवर्षी राज्य शासनाला सादर करावी लागते. राज्य शासनाकडून या माहितीच्या आधारे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला हमीदराबाबत शिफारस केली जाते. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडून हीच माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाला सादर केल्यानंतर खरिपातील उत्पादित शेतमालाचे हमीदर जाहीर केले जातात.

मागील वर्षी १५ जानेवारी रोजी दिल्लीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला होता. या आढाव्यानंतर या खरीप हंगामातील हमीदर फेब्रुवारी महिन्यातच जाहीर होेण्याचे संकेत होते. तथापि, गेल्या वर्षी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये हमीदर जाहीर करण्यात आले नव्हते. तोपर्यंत शेतकऱ्यांनी मूग, उडीद व कापूस बाजारात विकणे सुरू केले होते; पण यावर्षी फे ब्रुवारीतच हमीदर जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने कृषी विद्यापीठांनी नियोजन सुरू केले आहे. सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेले क्षेत्र व उत्पादन खर्च याचा आढावा घेण्यात येणार आहे. बाजारभाव व वाहतूक खर्च वगळून शेतमालाचे प्रत्यक्ष उत्पन्न, त्यासाठी लागलेली मजुरी, मशागत व पेरणीचा खर्च आदीचा ताळेबंद करू न राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. चारही कृषी विद्यापीठांची एकत्रित माहिती गोळा झाल्यानंतर शासनाद्वारे कृषिमूल्य आयोगाला यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात ही शिफारस केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

- उत्पादनावर ठरतात हमीदर शेतमालाचे आधारभूत दर ठरवताना अगोदरच्या वर्षी झालेल्या उत्पादनाचा आढावा घेण्यात येतो आाणि त्यानुसार हे दर पुढच्या वर्षीच्या विक्री हंगामासाठी हमी दर म्हणून जाहीर केले जातात. याकरिता राज्यातील इतर तीन कृषी विद्यापीठांसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषिमूल्य योजनेने ही माहिती राज्याच्या शेतमाल भाव माहिती कक्ष संचालकांकडे पाठवावी लगते. राज्य आणि देशातील कृषी विद्यापीठे, शासकीय कृषी विभाग व कृषी संस्थांनी पाठविलेल्या उत्पन्नाच्या दरावर हमीदर ठरवले जाणार आहेत.- उत्पादन खर्च ४२३१ रुपये, हमीदर ४०५० रुपये २०१४-१५ च्या खरीप हंगामात कपाशीच्या हमी दरासाठी ४०५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र शासनाकडे शिफारस केली होती. तथापि, शेतकऱ्यांना कापूस पिकविण्यासाठी लागलेला खर्च प्रतिक्विंटल ४,२३१ रुपये एवढा आहे. मागील वर्षी यापेक्षा बिकट परिस्थिती होती. त्यामुळे यावर्षी उत्पादन खर्चावर आधारित हमीदर जाहीर करयात यावेत, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. फेब्रुवारी महिन्यात खरीप शेतमालाचे हमीदर जाहीर होतात. त्यादृष्टीने नियोजन केले असून सप्टेंबर,नोव्हेबर महिन्यात शासनाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चाची माहिती पाठविली जाईल.- डॉ. राजेंद्र देशमुख, विभाग प्रमुख, सांख्यिकी व कृषी अर्थशास्त्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.