शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीककर्जे आली संकटात!

By admin | Updated: June 14, 2015 02:54 IST

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीककर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली असली

नवीन कर्जांबाबत नाबार्डनेही घेतला हात आखडता

मुंबई : शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीककर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली असली तरी त्यासाठी आपला हिस्सा देण्यास शासनाने अद्याप कुठलीही तरतूद केलेली नाही. दुसरीकडे नवीन कर्जाबाबत नाबार्डने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणारे पीककर्जच संकटात आले आहे. कर्जाचे पुनर्गठन करताना नाबार्डकडून ६० टक्के, राज्य शासनाकडून १५ टक्के आर्थिक भार उचलला जातो. राज्य बँक १० टक्के तर जिल्हा बँका १५ टक्के भार उचलतात. यातील शासनाचा १५ टक्के हिस्सा गेल्या १५ वर्षांपासून दिला जात नाही. त्यामुळे तो भार राज्य बँक आणि जिल्हा बँकांवर येतो. या पार्श्वभूमीवर नाबार्डकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून १५ टक्के अशी ७५ टक्के रक्कम मिळाल्याशिवाय पुनर्गठन करण्याबाबत राज्य बँकेने असमर्थता दर्शविली. त्यामुळे पुनर्गठनाचा पेच वाढला. गेल्यावर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करताना राज्य शासन आपल्या हिश्शापोटीची सुमारे २ हजार कोटी रुपयांची रक्कम देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. (विशेष प्रतिनिधी)रकमेची उभारणी चिंतेचा विषयनवीन पीककर्जाची रक्कम नाबार्डकडून ५० टक्के तर जिल्हा बँकांकडून ५० टक्के दिली जाते. नाबार्डकडे यंदा त्यापोटी ७ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात नाबार्डने अलीकडे ४ हजार ५०० कोटी रुपयेच मंजूर केल्याने नवीन कर्जासाठी रकमेची उभारणी कशी करायची, हा चिंतेचा विषय आहे. - कर्जाचे पुनर्गठन करताना शेतकऱ्यांवरील कर्ज कायम राहते, पण जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते. त्याऐवजी शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार आणि वित्त विभागाला सांगितल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांच्या व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.पावसावर मदार..गेल्या दोन वर्षांमध्ये दुष्काळ आणि काही भागांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात आणले. आता मान्सून राज्यातील काही भागात बरसायला सुरुवात झाली आहे. पावसाने साथ दिली तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सारी मदार आता पावसावर आहे. कर्जाबाबत शासनाचा हिस्सा निश्चितपणे आणि तत्काळ दिला जाईल. तसेच नाबार्डने त्यांच्या हिश्शापोटी शासनाची हमी मागितलेली आहे. ती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री.