शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खोरला पाणी मिळाले; पण जलपूजनापुरते

By admin | Updated: September 22, 2016 02:06 IST

अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले

खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले; पण फक्त जलपूजनापुरतेच. हे पाणी आल्याने येथील शेतकरी सुखावला होता; मात्र हा आनंद पाण्याबरोबर वाहून गेला. येथील फडतरेवस्ती तलावात रविवारी पाणी पोहोचले आणि मंगळवारी (दि. २0) पाणी बंद करण्यात आले. खोर परिसरातील शेतकऱ्यांनी फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी केली होती. तलाव पूर्ण भरून सांडव्यातून पाणी जर ओढ्याला गेले नाही, तर पूर्व भागामधील शेतकऱ्यांना काहीच फायदा या तलावापासून होणार नव्हता, तसेच झाले आहे. पाणी फक्त जलपूजनापुरतेच सोडले का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. आता पुरंदर जलसिंचन उपसा योजनेचे पाणी हे डोंबेवाडी पाझर तलावात कधी सोडतात या कडे सर्वांचे लक्ष लागल आहे. हा तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच, आणखी वाढीव पाणी फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत जनाई-शिरसाई जलसिंचन उपसायोजनेचे व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक कुवर म्हणाले, फडतरेवस्ती तलावात दोन दिवस पाणी सोडण्यात आले आहे. पुरंदर व बारामती तालुक्यातील बरीच गावे ही पाणी सोडण्याची वाट पाहत आहेत. राजुरी, बोरकरवाडी, आंबी, पांडेश्वर या गावांनादेखील पाणी देणे गरजेचे आहे. यांना पाणी दिले नाही तर लगेचच पाणी चोरी करणे, दमदाटी करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व गावांना समान पाणी सोडण्यात आले असून, नंतर खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात येईल. सध्या लिकेजद्वारे २ क्युसेक्स पाणी पद्मावती तलावात चालू असल्याचे कुवर यांनी सांगितले आहे.(वार्ताहर)>जलपूजन करायला नको होतेआमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई-शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यात आले; मात्र लगेचच जलपूजन करायला नको होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, दरवर्षीची गत आहे की जलपूजन झाले की अधिकारी म्हणतात पाणी पोहोचले आहे. खोरला आता पाणी बंद केले तरी चालेल, अशीच समजूत योजना अधिकाऱ्यांची झाली आहे.>टँकरदेखील झाला बंद फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून मिळावा, अशी माफक अपेक्षा या भागातील जनतेची होती; मात्र जनतेच्या सर्वच अपेक्षा फोल ठरल्या. >एकीकडे सिंचन योजनेचे पाणी बंद करण्यात आले, तर दुसरीकडे गावाला पाणीपुरवठा करणारे टँकरदेखील बंद झाल्याने खोर गाव हे अधीकच पाण्याच्या अडचणीत सापडले आहे.