शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा भाजून निघाला

By admin | Updated: May 18, 2016 04:40 IST

मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.

मुंबई/पुणे/नागपूर : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरक्ष: भाजून निघाला असून, असह्य उकाड्यामुळे मुंबईकरांच्याही जिवाची काहिली झाली आहे. मंगळवारी अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीव्र झालेली उष्णतेची लाट अजून दोन दिवस राहणार असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देत खबरदारी घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. राज्यातील तापमानात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढ होत आहे. आतातर उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून, पुढील किमान दोन दिवस ती कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>नागपूरचे तापमान ४५.९ अंशावर>मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली असून, मंगळवारी अकोल्यापाठोपाठ वर्ध्याचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. उपराजधानी नागपुरातील पारा ४५.९ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या रविवारी नागपुरातील तापमान ४५.७ अंशावर पोहोचले होते. >अकोला ४६.३, वर्धा ४६, नागपूर ४५.९, जळगाव ४५.२, परभणी ४४.६, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर ४४.४, ब्रह्मपुरी ४४.३, नांदेड ४३.५, वाशिम ४३, बुलडाणा, सोलापूर ४२.५, सांगली ४२.३, औरंगाबाद ४२.२, पुणे, मालेगाव ४२, गोंदिया ४१.९, सातारा ४१.३, कोल्हापूर ४१.१, नाशिक ४०.४, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.५, महाबळेश्वर ३४, मुंबई ३३. >अशी घ्या काळजी...तहान लागली नसली तरी अधूनमधून पाणी प्या. हलके, पातळ, सुती कपडे घाला. दुपारी १२ ते ३च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळा.बाहेर जाताना गॉगल व टोपी घाला.चेहरा, डोके ओल्या कपड्याने झाका. घरातून बाहेर पडताना लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी पिऊन निघा. गरोदर माता व आजारी लोकांची विशेष काळजी घ्या.अशक्तपणा, जडपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखावीत. चक्कर येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.>उष्माघाताचे २ बळीचोवीस तासांत उष्माघाताने दोघांचा बळी गेला. भर उन्हात शेतात काम केल्याने खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र महाले यांचा मृत्यू झाला. पैठण येथे रस्त्याचे काम करणाऱ्या छबाबाई कोरडे यांचा बळी गेला.>मान्सून निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठीची (मान्सून) अनुकूलता वाढली असून, पुढील २४ तासांत तो निकोबार बेट, अंदमानचा समुद्र आणि बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचेल, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’ला दिली.