शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा भाजून निघाला

By admin | Updated: May 18, 2016 04:40 IST

मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.

मुंबई/पुणे/नागपूर : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरक्ष: भाजून निघाला असून, असह्य उकाड्यामुळे मुंबईकरांच्याही जिवाची काहिली झाली आहे. मंगळवारी अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीव्र झालेली उष्णतेची लाट अजून दोन दिवस राहणार असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देत खबरदारी घेण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. राज्यातील तापमानात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढ होत आहे. आतातर उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून, पुढील किमान दोन दिवस ती कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>नागपूरचे तापमान ४५.९ अंशावर>मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली असून, मंगळवारी अकोल्यापाठोपाठ वर्ध्याचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. उपराजधानी नागपुरातील पारा ४५.९ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या रविवारी नागपुरातील तापमान ४५.७ अंशावर पोहोचले होते. >अकोला ४६.३, वर्धा ४६, नागपूर ४५.९, जळगाव ४५.२, परभणी ४४.६, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर ४४.४, ब्रह्मपुरी ४४.३, नांदेड ४३.५, वाशिम ४३, बुलडाणा, सोलापूर ४२.५, सांगली ४२.३, औरंगाबाद ४२.२, पुणे, मालेगाव ४२, गोंदिया ४१.९, सातारा ४१.३, कोल्हापूर ४१.१, नाशिक ४०.४, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.५, महाबळेश्वर ३४, मुंबई ३३. >अशी घ्या काळजी...तहान लागली नसली तरी अधूनमधून पाणी प्या. हलके, पातळ, सुती कपडे घाला. दुपारी १२ ते ३च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळा.बाहेर जाताना गॉगल व टोपी घाला.चेहरा, डोके ओल्या कपड्याने झाका. घरातून बाहेर पडताना लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी पिऊन निघा. गरोदर माता व आजारी लोकांची विशेष काळजी घ्या.अशक्तपणा, जडपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखावीत. चक्कर येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.>उष्माघाताचे २ बळीचोवीस तासांत उष्माघाताने दोघांचा बळी गेला. भर उन्हात शेतात काम केल्याने खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र महाले यांचा मृत्यू झाला. पैठण येथे रस्त्याचे काम करणाऱ्या छबाबाई कोरडे यांचा बळी गेला.>मान्सून निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठीची (मान्सून) अनुकूलता वाढली असून, पुढील २४ तासांत तो निकोबार बेट, अंदमानचा समुद्र आणि बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचेल, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ‘लोकमत’ला दिली.