शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये - प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: May 31, 2016 19:44 IST

‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 31 -  ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी बचाव करत असताना चिमटादेखील काढला आहे. खडसे यांच्या मोबाईलवर कुणाचे दूरध्वनी आले म्हणून ते गुन्हेगार होत नाहीत. परंतु या प्रकरणातून वाचण्यासाठी खडसे यांनी जातीचा आधार घेऊ नये, असे वक्तव्य डॉ.आंबेडकर यांनी केले. नागपुरातील रविभवन येथे ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. 
खडसेंच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमचे फोन आले असे आरोप होत आहेत. परंतु कुणाच्याही मोबाईलवर कुणाचाही फोन येऊ शकतो. खडसे यांनी परत फोन करुन संभाषण केले का याची माहिती उपलब्ध नाही. परंतु खडसे यांनी या प्रकरणात जातीचा आधार घेतला तर त्यांची अवस्था छगन भुजबळांसारखी होऊ शकते, असे डॉ.आंबेडकर म्हणाले. ‘हॅकर’कडे जर संभाषणाची माहिती उपलब्ध असेल तर त्याने ती कुठल्याही दबावात न येता सार्वजनिक करावी. आम्ही त्याला संरक्षण देऊ असेदेखील प्रतिपादन त्यांनी केले.
 
प्रभाग पद्धती बहुजनांसाठी अन्यायकारकच
राज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घ्यायचे ठरविले आहे. शासनाचा हा निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या धनदांडग्या उमेदवारांना फायदेशीर आहे. परंतु यामुळे हिंदू समाजातील उपेक्षित घटक व बहुजनांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात कॉंग्रेस व भाजपाची विचारसरणी एकच आहे, अशी टीका डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
 
केंद्रात पुढील वेळीदेखील भाजपच येणार 
 
सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता राज्यात पुढील वेळी भाजपाचे सरकार येईल की नाही याची शाश्वती नाही. परंतु केंद्रात मात्र भाजपाच येईल, असे एकूण चित्र आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. हाफिज सईदसंदर्भात संयुक्त राष्ट्रात चीनने आपल्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी चीनमधील वस्तूंना देशबंदी करायला हवी होती. ते न करता आसाममधील विजयानंतर इतर पूर्वोत्तर राज्यांमध्येदेखील सत्ता स्थापन करू, असा दावा भाजपाने केला आहे. येथे भाजपा सत्तेवर आल्यास येथील स्थैर्य नाहिसे होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनसोबतच्या संबंधांवर यामुळे परिणाम होईल व याचा फटका स्थानिकांना बसेल, असे डॉ.आंबेडकर म्हणाले.