शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

‘खादी ग्रामोद्योग’ मोडण्याचा डाव

By admin | Updated: November 24, 2015 00:23 IST

सुरेश पाटील : राज्य सरकारदरबारी महामंडळ बेदखल

सांगली : महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे भाजप सरकारने दुर्लक्ष केले असून बारा बलुतेदार व बेरोजगारांच्या थकित कर्जाचा प्रश्न निकाली काढलेला नाही. त्यामुळे बलुतेदार वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात शासनाने कोणत्याही नवीन योजना जाहीर केलेल्या नाहीत. खादी व ग्रामोद्योग मंडळ मोडकळीस आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. शासनाच्या विरोधात बारा बलुतेदार फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बारा बलुतेदारांच्या थकित कर्जाचा प्रश्न प्रलंबित होता. आघाडी सरकारच्या काळात ७९ कोटी १६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा आदेश काढण्यात आला. परंतु प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. भाजप सरकारने कर्जमाफीची रक्कम बँकांना न पाठविल्यामुळे बलुतेदारांना नवीन कर्ज प्रकरण मंजूर होत नाही. बलुतेदार संघटनेने आझाद मैदानावर कर्जमाफीसाठी आंदोलन केले. तेव्हा शासनाने आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण न केल्याने फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. ग्रामोद्योगाच्या विकासासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती ही योजनाही २००८ पासून सुरू होती. पण मोदी सरकारच्या काळात या योजनेचे काम ठप्प झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ महात्मा गांधींच्या नावाचा जयजयकार करीत आहेत. पण त्यांच्या तत्त्वांचा अंगिकार केल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण कारागीर योजनाही बंद झाल्यापासून हजारो युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खादी व ग्रामोद्योग चळवळच मोडकळीस आली आहे. (प्रतिनिधी)सहा योजना बासनातखादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असताना आपण शासनाकडे बिनव्याजी बीजभांडवल योजना, ग्रामीण कारागीर विकास योजना, मधमाशा पालन योजना, ग्रामोद्योग वसाहती, कर्जमाफी, ग्रामोद्योग समूह अशा सहा योजना सादर केल्या. पण त्याची अंमलबजावणी नव्या सरकारने केलेली नाही.