शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘खादी ग्रामोद्योग’ मोडण्याचा डाव

By admin | Updated: November 24, 2015 00:23 IST

सुरेश पाटील : राज्य सरकारदरबारी महामंडळ बेदखल

सांगली : महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे भाजप सरकारने दुर्लक्ष केले असून बारा बलुतेदार व बेरोजगारांच्या थकित कर्जाचा प्रश्न निकाली काढलेला नाही. त्यामुळे बलुतेदार वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात शासनाने कोणत्याही नवीन योजना जाहीर केलेल्या नाहीत. खादी व ग्रामोद्योग मंडळ मोडकळीस आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. शासनाच्या विरोधात बारा बलुतेदार फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बारा बलुतेदारांच्या थकित कर्जाचा प्रश्न प्रलंबित होता. आघाडी सरकारच्या काळात ७९ कोटी १६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा आदेश काढण्यात आला. परंतु प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. भाजप सरकारने कर्जमाफीची रक्कम बँकांना न पाठविल्यामुळे बलुतेदारांना नवीन कर्ज प्रकरण मंजूर होत नाही. बलुतेदार संघटनेने आझाद मैदानावर कर्जमाफीसाठी आंदोलन केले. तेव्हा शासनाने आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण न केल्याने फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. ग्रामोद्योगाच्या विकासासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती ही योजनाही २००८ पासून सुरू होती. पण मोदी सरकारच्या काळात या योजनेचे काम ठप्प झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ महात्मा गांधींच्या नावाचा जयजयकार करीत आहेत. पण त्यांच्या तत्त्वांचा अंगिकार केल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण कारागीर योजनाही बंद झाल्यापासून हजारो युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खादी व ग्रामोद्योग चळवळच मोडकळीस आली आहे. (प्रतिनिधी)सहा योजना बासनातखादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असताना आपण शासनाकडे बिनव्याजी बीजभांडवल योजना, ग्रामीण कारागीर विकास योजना, मधमाशा पालन योजना, ग्रामोद्योग वसाहती, कर्जमाफी, ग्रामोद्योग समूह अशा सहा योजना सादर केल्या. पण त्याची अंमलबजावणी नव्या सरकारने केलेली नाही.