शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

देशाची दिशाभूल करणा-या खडसेंनी राजीनामा द्यावा!

By admin | Updated: April 23, 2015 05:44 IST

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात फक्त तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चुकीची माहिती केंद्र सरकारला देणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ

मुंबई : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात फक्त तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चुकीची माहिती केंद्र सरकारला देणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.या वेळी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, लोकसभेत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. राज्य शासनाने तसाच अहवाल पाठविल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात गेल्या साडेतीन महिन्यांत राज्यातील ६२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात केवळ विदर्भातील ४४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे देशाची दिशाभूल करणाऱ्या खडसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. निवडणुकीपूर्वी विदर्भातील आत्महत्यांविषयी चाय पे चर्चा करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता मात्र शेतकऱ्यांची थट्टा आरंभली आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून आता बारा दिवस झाले. अद्याप महसूल मंत्र्यांनी विभागीय बैठका घेऊन टंचाईचा आढावा घेतला नाही, तसेच पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर दुष्काळ निवारणाच्या बैठका घेतल्या नाहीत, असे विखे-पाटील म्हणाले. डिसेंबरमध्ये सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले, पण संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना वाटली गेली नाही. त्यातच केंद्राने निकष बदलल्यामुळे आता तीस टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश मदतीच्या यादीत करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा आरोप विखे यांनी केला. नागपुरात अयशस्वी ठरलेल्या पोलीस आयुक्तांना पुण्यात बढतीवर पाठविण्याचा काय अर्थ घ्यायचा, असा सवाल विखे-पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. पुणे शहर आधीच दहशतवादी कारवायांसाठी गाजत असताना हिमांशू रॉय, संजय बर्वे, नागराळे अशा गाजलेल्या अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली आहे. राज्यात गुन्हेगार अक्षरश: मोकाट सुटलेले आहेत. पण मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालकांच्या दबावाखाली का काम करीत आहेत हे कळत नाही, असा चिमटाही विखे-पाटील यांनी काढला. (प्रतिनिधी)