शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

देशाची दिशाभूल करणा-या खडसेंनी राजीनामा द्यावा!

By admin | Updated: April 23, 2015 05:44 IST

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात फक्त तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चुकीची माहिती केंद्र सरकारला देणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ

मुंबई : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात फक्त तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चुकीची माहिती केंद्र सरकारला देणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.या वेळी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, लोकसभेत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. राज्य शासनाने तसाच अहवाल पाठविल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात गेल्या साडेतीन महिन्यांत राज्यातील ६२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात केवळ विदर्भातील ४४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे देशाची दिशाभूल करणाऱ्या खडसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. निवडणुकीपूर्वी विदर्भातील आत्महत्यांविषयी चाय पे चर्चा करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता मात्र शेतकऱ्यांची थट्टा आरंभली आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून आता बारा दिवस झाले. अद्याप महसूल मंत्र्यांनी विभागीय बैठका घेऊन टंचाईचा आढावा घेतला नाही, तसेच पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर दुष्काळ निवारणाच्या बैठका घेतल्या नाहीत, असे विखे-पाटील म्हणाले. डिसेंबरमध्ये सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले, पण संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना वाटली गेली नाही. त्यातच केंद्राने निकष बदलल्यामुळे आता तीस टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश मदतीच्या यादीत करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा आरोप विखे यांनी केला. नागपुरात अयशस्वी ठरलेल्या पोलीस आयुक्तांना पुण्यात बढतीवर पाठविण्याचा काय अर्थ घ्यायचा, असा सवाल विखे-पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. पुणे शहर आधीच दहशतवादी कारवायांसाठी गाजत असताना हिमांशू रॉय, संजय बर्वे, नागराळे अशा गाजलेल्या अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली आहे. राज्यात गुन्हेगार अक्षरश: मोकाट सुटलेले आहेत. पण मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालकांच्या दबावाखाली का काम करीत आहेत हे कळत नाही, असा चिमटाही विखे-पाटील यांनी काढला. (प्रतिनिधी)