शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, ५ ऑगस्टला सेनाप्रवेश

By admin | Updated: August 2, 2014 13:19 IST

राष्ट्रवादीचे सावतंवाडीतील आमदार दीपक केसरकर यांनी अखेर आज आमदारकीचा राजीनामा दिला असून ५ ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ऑनलाइन टीम
मुंबई दि. २ - राष्ट्रवादीचे सावतंवाडीतील आमदार दीपक केसरकर यांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला असून ५ ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यापूर्वी त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. 
नारायण राणेंचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या दीपक केसरकरांनी गेल्या महिन्यातच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचे जाहीर केले होते, तसेच लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. आपल्या तत्वांशी, स्वाभिमानाशी तडजोड करणे अशक्य असल्याने सिंधुदुर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तींशी लढण्यासाठी आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान केसरकरांनी निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता. तसेच त्यांच्याविरोधात प्रचार करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना आणि नीलेश राणेंना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला असतानाही केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सर्व प्रकारामुळे केसरकर व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. 
५ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार असून तेव्हा त्यांच्या उपस्थितीतीच आपम पक्षात प्रवेश करू असे केसरकरांनी सांगितले. सिंधुदुर्गचा विकास करमे हेच आपले ध्येय होते व यापुढेही आपण त्यासाठीच काम करू असे ते म्हणाले. आपण नेहमीच राड संस्कृतीच्या विरोधात लढा दिला, भविष्यातही आपण असाच लढा देत राहू, असेही त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सावंतवाडीतूनच निवडणूक लढवू असे संकेतही त्यांनी दिले.