शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

नारायण राणे संपलेले प्रकरण

सावंतवाडी : रेडीला उच्च दर्जाचे बंदर असताना आरोंदा बंदराला परवानगी देणे चुकीचेच आहे. आरोंदा बंदर हे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जन्माला घातलेले अपत्य आहे, असा आरोप सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला. पंधरा वर्षांत राणे यांनी केलेल्या कामांची चौकशी करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. केसरकर यांनी यावेळी राणे यांनी केलेली पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू, असा सवालही केला. आरोंदा येथे झालेल्या दगडफेक व लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मी या जिल्ह्याचा पालक आहे. त्यामुळे मी माझ्याच लोकांवर लाठीमार करण्याचे आदेश कसे देईन? हे आदेश पोलिसांच्या वरिष्ठस्तरावर होत असतात. त्यात लोकप्रतिनिधींची कोणतीही भूमिका असत नाही. मी फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेऊ शकतो. लाठीमार करा, एफआयआरमधील कलमे बदला, असे सांगू शकत नाही, असा खुलासाही केला.चार दिवसांपूर्वी आरोंदा येथे काँग्रेसचे पदाधिकारी गेले होते. जर त्यांनीच या जेटीला परवानगी दिली, तर ते कशासाठी गेले? लोकांना भडकावण्यापेक्षा यातून मार्ग काढून देणे गरजेचे आहे, असे मतही केसरकर यांनी यावेळी मांडले. आतापर्यंत त्यांना आरोंदावासीयांचा पुळका का आला नाही? माझ्या मतदारसंघातील हा प्रश्न असून आरोंदावासीय माझे आहेत. त्यांनी मला मते दिली आहेत. त्यामुळे त्यांची अडचण ती माझी अडचण असून, त्यांना न्याय हा दिलाच जाईल. प्रदूषणकारी प्रकल्प पर्यटनस्थळी नकोचआरोंदा हे पर्यटन स्थळ असून तेथे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये, असे मला वाटते, आरोंदा पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत आहे. पण तेथे अशा प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या काळात परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल केसरकर यांनी केला. आरोंदा व तेरेखोल खाडीपात्राच्या मुखाशी असलेली भिंत जर फोडली गेली, तर त्याचा फटका बांदा व आरोंदा गावांना बसणार आहे. तेरेखोल खाडीपात्राचा उगम आंबोलीतून होतो. निसर्गाला आणखी किती हानी पोहोचवणार, असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित (प्रतिनिधी)नारायण राणे संपलेले प्रकरणनारायण राणे हे माझ्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देत राहिलो, तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. अनेक कंपन्या जिल्ह्यात येऊ पाहात आहेत. पण चांगले वातावरण नसेल, तर ते होणार नाही. त्यामुळे आता टीकेला उत्तर नाही, असे सांगत, नारायण राणे हे माझ्यासाठी संपलेले प्रकरण आहे, असे केसरकर यांनी सांगितले.