शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

केळकर समितीवरून सरकारपुढे पेच!

By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST

बहुचर्चित केळकर समितीने विकासाचे मापदंड लावताना राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका या चार पातळ्यांवर विकास योजना राबवाव्यात असे सांगितले आहे. तालुका हा निकष लावला की राज्यातले

तालुक्यांचा विकास आणि मागास मराठवाड्यामुळे सरकारची कोंडीअतुल कुलकर्णी -नागपूर बहुचर्चित केळकर समितीने विकासाचे मापदंड लावताना राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका या चार पातळ्यांवर विकास योजना राबवाव्यात असे सांगितले आहे. तालुका हा निकष लावला की राज्यातले दुष्काळग्रस्त १५० तालुके येतात. त्यामुळे त्याला मान्यता दिली तर असे तालुके विदर्भापेक्षा सगळ्यात जास्त उर्वरित महाराष्ट्रात आहेत. एकदा का ही शिफारस स्वीकारली की बाकीच्या शिफारशी देखील मान्य कराव्या लागतील. त्यातही दरडोई उत्पन्नात मराठवाडा सगळ्यात मागे आहे. या अहवालानुसार निधीचे वाटप करायचे झाल्यास उर्वरित महाराष्ट्रास जास्त निधी द्यावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे केळकर अहवाल मांडण्यासाठी सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.आघाडी सरकारने देखील हा अहवाल या व अशा कारणांमुळे मांडला नव्हता. विधानपरिषदेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सुचक वक्तव्य केले. ६५० पानांचा अहवाल आहे, वाचायला वेळ लागेल की नाही? आधी वाचू द्या, मग तो मांडू, असे म्हणत त्यांनी सुटकेची एक जागा खुली करुन ठेवली आहे. तरीही सरकार उद्या हा अहवाल मांडणार की नाही या विषयी कोणतीही स्पष्टता झालेली नाही. केळकर समितीच्या अहवालात अनेक गोष्टी विदर्भात अधिवेशन होत असताना मांडणे सरकारसाठी अडचणीचे आहे. अहवालानुसार दरडोई उत्पन्नात उर्वरित महाराष्ट्र (६८,८१० रू.), विदर्भ (५२,२८२ रू.) तर मराठवाडा (४०,८२४ रू.) असे चित्र आहे. मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न उर्वरित महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी तर विदर्भाचे २७ टक्क्यांनी कमी आहे. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार जरी निधीचे वाटप होत असले तरी केळकर समितीने हे वाटप देखील नव्याने करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन केले तर उर्वरित महाराष्ट्राला जास्त निधी मिळणार आहे. समितीने निधीचे वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती, जनजाती यांच्यासाठीचा निधी वजा केल्यानंतर जो निधी उरेल त्यातला सर्वसाधारण क्षेत्रासाठी ७० टक्के व जलक्षेत्रासाठी ३० टक्के द्यावा असे सांगितले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या राज्यातील ४४ तालुक्यांसाठी १७९८ कोटी, भूस्तर प्रतिकुल असणाऱ्या ८५ तालुक्यांसाठी १७३२ कोटी रुपये मालगुजारी तलावासाठी २५२० कोटी रुपये आणि खारपानपट्यासाठी ५४२ कोटी रुपये एवढा निधी मर्यादित काळापर्यंत सतत दिला पाहिजे. या क्षेत्रांना निधी दिल्यानंतर उर्वरित जलक्षेत्रांसाठी निधीवाटप करावे. ते वाटप देखील उर्वरित महाराष्ट्रासाठी ४३.१५ टक्के, विदर्भासाठी ३५.२६ टक्के आणि मराठवाड्यासाठी २१.५९ टक्के सुचवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पेयजलाची तूट सगळ्यात जास्त उर्वरित महाराष्ट्रात ५४.६० टक्के एवढी आहे. तर ही तूट विदर्भात २२.३९ आणि मराठवाड्यात २३.०१ टक्के आहे. विकासाची तूट मात्र विदर्भाची ४८.१३ टक्के एवढी सगळ्ळात जास्त आहे. ही तूट मराठवाड्याची २०.१६ आणि उर्वरित महाराष्ट्राची ३१.७१ टक्के आहे.त्यामुळे हा अहवाल स्वीकारला तर विदर्भाच्या वाट्याला किती निधी मिळेल याविषयी या भागातल्या नेत्यांना शंका वाटत आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल सभागृहात येईल असे सांगितले जात होते पण तो आला नाही. आता अधिवेशन संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातही उद्या विरोधकांचा अंतीम आठवडा प्रस्ताव आहे. हे लक्षात घेता केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडला जाईल, त्यावर चर्चा होईल हे सगळे मुद्दे अजूनतरी अधांतरीच आहेत.