शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केजरीवालांचा जनलोकपाल अण्णांना अमान्य

By admin | Updated: December 2, 2015 02:01 IST

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने विधानसभेत मांडलेले जनलोकपाल विधेयक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अमान्य आहे. केजरीवाल यांचा जनलोकपाल कमकुवत

पारनेर : अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने विधानसभेत मांडलेले जनलोकपाल विधेयक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अमान्य आहे. केजरीवाल यांचा जनलोकपाल कमकुवत असल्याचे सांगत अण्णांनी विधेयकात काही बदल सूचविले आहेत तसेच केंद्रात लोकपाल विधेयकाबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने अण्णांनी नाराजीही व्यक्त केली आहे.केजरीवाल सरकारने मांडलेल्या जनलोकपाल विधेयकावर वाद झाल्यानंतर मंगळवारी ‘आप’चे नेते कुमार विश्वास, संजय सिंह यांनी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारे यांचे शिष्य, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागील आठवड्यात जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत मांडले. ते ‘महाजोकपाल’ असल्याचा आरोप अण्णांच्या टीमचे माजी सदस्य प्रशांत भूषण यांनी केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना विधेयकाची माहिती व्हावी म्हणून, मंगळवारी कुमार विश्वास, संजय सिंह यांना राळेगणसिद्धीत पाठविले होते. त्यांनी अण्णांना विधेयकाची माहिती दिली. (प्रतिनिधी)राजकीय मतभेदातून आरोपपत्रकारांशी बोलताना कुमार विश्वास म्हणाले, ज्यांनी लोकपालवर आरोप केले आहेत, त्यांना भाजपाचे मंत्री अरुण जेटली व इतर मंत्र्यांना वाचवायचे आहे. किरण बेदी, व्ही. के. सिंह, प्रशांत भूषण यांचा यात राजकीय स्वार्थ आहे. अण्णांनी सूचविलेले बदल आम्ही दिल्ली सरकारकडे देणार आहोत. मुख्यमंत्री केजरीवाल अण्णांच्या सूचना स्वीकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधेयक मांडण्याआधी अण्णांच्या सूचना का घेतल्या नाहीत? या प्रश्नाला कुमार विश्वास यांनी बगल दिली. आम्ही पूर्वीसारखेच लोकपाल विधेयक मांडल्याचे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. अण्णांच्या सूचनालोकपालला पदावरून हटविण्यासाठी आधी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्यात यावे. नियुक्त समितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबरोबरच माजी लोकपाल व राजकारण विरहीत सामाजिक क्षेत्रातील एका व्यक्तीचा समावेश आवश्यक आहे, असे बदल अण्णांनी सूचविले आहेत.