शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दोन हात करण्याची तयारी ठेवा

By admin | Updated: January 13, 2017 04:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारदर्शी कारभार हवा असल्याने शिवसेनेबरोबर युती होणार असेल, तर ती सत्तेकरिता

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारदर्शी कारभार हवा असल्याने शिवसेनेबरोबर युती होणार असेल, तर ती सत्तेकरिता नव्हे तर पारदर्शी कारभाराकरिता होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, त्याच वेळी भाजपा कार्यकर्त्याने निवडणूक लढताना समोर शत्रू कोण आहे, त्याचा विचार न करता मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचे आहे, असे सांगत वेळप्रसंगी शिवसेनेबरोबर दोन हात करण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेतही दिले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी येथे संपन्न झाली. समारोपाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीला आपल्याला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. युतीचे काय करायचे, याची चर्चा योग्य ठिकाणी सुरू आहे. अनेक बाबतीत शिवसेनेसोबत भाजपाचे मतभेद असून ही लपून ठेवायची गोष्ट नाही. भाजपाचा आग्रह हा पारदर्शी कारभाराचा आहे. मात्र, तरीही आम्ही युतीचा आग्रह धरत आहोत, कारण अनेक वर्षांनंतर काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला आणण्यात येत आहे. लुटारूंच्या हातून मोदींनी देशाला बाहेर काढले. त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळावे, याकरिता आम्ही युतीचा आग्रह धरत असलो तरी आता युती केवळ सत्तेकरिता होणार नसून किमान समान कार्यक्रमावर केली जाईल. त्या कार्यक्रमातून सामान्य माणसाच्या जीवनात पारदर्शी परिवर्तन होईल.युतीबाबतचा निर्णय पदाधिकारी करतील. मात्र, सैनिकाचे काम हे मैदानात लढण्याचे असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहात. त्यामुळे निवडणुकीत समोर शत्रू कोण आहे, याचा विचार न करता जनतेच्या हिताचे पारदर्शक राज्य निर्माण करण्याकरिता तुम्हाला या वेळीही लढायचे आहे. मोदी नि:स्वार्थी भावनेने २४ तास काम करीत आहेत. आपल्याला त्यांच्याच मार्गाने जायचे आहे. बुथचा कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. त्याला सक्रिय करणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)मोठा निधी चेकने स्वीकारानिवडणूक निधीमध्ये पारदर्शकता यावी, याकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अथवा चेकद्वारे पैसे स्वीकारण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अन्य पक्षांतून येणाऱ्यांना स्वीकारानिवडणुकीत तिकीट कुणाला मिळेल, याची चिंता करू नका, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नेत्याच्या अवतीभवती फिरणाऱ्याला नव्हे तर जनतेच्या भोवती फिरणाऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षात येणाऱ्यांना मोठ्या मनाने स्वीकारा. आपण केवळ ताकद असलेल्या लोकांनाच प्रवेश देत आहोत. पक्षातील जुने व नवे यांना एकत्र लढायचे आहे, असे ते म्हणाले.