शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

दोन हात करण्याची तयारी ठेवा

By admin | Updated: January 13, 2017 04:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारदर्शी कारभार हवा असल्याने शिवसेनेबरोबर युती होणार असेल, तर ती सत्तेकरिता

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारदर्शी कारभार हवा असल्याने शिवसेनेबरोबर युती होणार असेल, तर ती सत्तेकरिता नव्हे तर पारदर्शी कारभाराकरिता होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, त्याच वेळी भाजपा कार्यकर्त्याने निवडणूक लढताना समोर शत्रू कोण आहे, त्याचा विचार न करता मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचे आहे, असे सांगत वेळप्रसंगी शिवसेनेबरोबर दोन हात करण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेतही दिले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी येथे संपन्न झाली. समारोपाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीला आपल्याला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. युतीचे काय करायचे, याची चर्चा योग्य ठिकाणी सुरू आहे. अनेक बाबतीत शिवसेनेसोबत भाजपाचे मतभेद असून ही लपून ठेवायची गोष्ट नाही. भाजपाचा आग्रह हा पारदर्शी कारभाराचा आहे. मात्र, तरीही आम्ही युतीचा आग्रह धरत आहोत, कारण अनेक वर्षांनंतर काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला आणण्यात येत आहे. लुटारूंच्या हातून मोदींनी देशाला बाहेर काढले. त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळावे, याकरिता आम्ही युतीचा आग्रह धरत असलो तरी आता युती केवळ सत्तेकरिता होणार नसून किमान समान कार्यक्रमावर केली जाईल. त्या कार्यक्रमातून सामान्य माणसाच्या जीवनात पारदर्शी परिवर्तन होईल.युतीबाबतचा निर्णय पदाधिकारी करतील. मात्र, सैनिकाचे काम हे मैदानात लढण्याचे असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहात. त्यामुळे निवडणुकीत समोर शत्रू कोण आहे, याचा विचार न करता जनतेच्या हिताचे पारदर्शक राज्य निर्माण करण्याकरिता तुम्हाला या वेळीही लढायचे आहे. मोदी नि:स्वार्थी भावनेने २४ तास काम करीत आहेत. आपल्याला त्यांच्याच मार्गाने जायचे आहे. बुथचा कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. त्याला सक्रिय करणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)मोठा निधी चेकने स्वीकारानिवडणूक निधीमध्ये पारदर्शकता यावी, याकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अथवा चेकद्वारे पैसे स्वीकारण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अन्य पक्षांतून येणाऱ्यांना स्वीकारानिवडणुकीत तिकीट कुणाला मिळेल, याची चिंता करू नका, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नेत्याच्या अवतीभवती फिरणाऱ्याला नव्हे तर जनतेच्या भोवती फिरणाऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षात येणाऱ्यांना मोठ्या मनाने स्वीकारा. आपण केवळ ताकद असलेल्या लोकांनाच प्रवेश देत आहोत. पक्षातील जुने व नवे यांना एकत्र लढायचे आहे, असे ते म्हणाले.