शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी समाजात एकी ठेवा

By admin | Updated: June 8, 2017 01:31 IST

वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत. ही चांगली बाब आहे. परंतु, एकमेकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. समाजात कोणतीही फूट पडणार नाही, याची काळजी घ्या. वंजारी समाजातील एकी कायम ठेवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. वंजारी महासंघातर्फे नव्याने निवड झालेल्या समाजातील पोलीस उपनिरीक्षकांचा गौरव कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी झाला. त्या वेळी मुंडे बोलत होत्या. आमदार महेश लांडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे, ज्येष्ठ वकील सुधाकर आव्हाड, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते. जातीपातीची शिकवण आम्हाला दिलेली नाही. परंतु, आपण ज्या समाजात जन्माला आलो, तो समाज वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज प्रत्येक समाजात भिंती वाढत चालल्या आहेत. राजकारणी त्यास खतपाणी घालून अधिक मजबूत करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, अहल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक समाजाने वाटून घेतले आहे. शिवाय या नेत्यांना सोशल मीडियातून बदनाम करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सर्व प्रकार तरुणांनी थांबवून आपली ऊर्जा सकारात्मक गोष्टीसाठी वापरली पाहिजे, असा सल्ला मुंडे यांनी दिला. अन्यथा मी फोटो काढणार नाहीपंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्काराच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली. त्यामुळे उडालेला गोंधळ थांबविण्यासाठी दस्तुरखुद्द ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी हातात माईक घेतला. व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी खाली जावे अन्यथा मी फोटो काढू देणार नाही, असा सज्जड इशारा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबला. >पिंपरी-चिंचवड : गोपीनाथ मुंडेंचा गड गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवडवर विशेष प्रेम होते. त्या वेळीपासून हा मुंडेंचा गड म्हणून ओळखला जात आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. द्रोणाचार्यांनी ज्याप्रमाणे अर्जुन व दुर्योधन या दोघांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे आम्हालाही मुंडे यांनी शिकवण दिली. परंतु, अर्जुनाच्या भूमिकेतून मी समाजासाठी हे धर्मयुद्ध लढण्याचे ठरविले आहे, असे सांगून पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.