शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

डोके शांत ठेवा ; टेन्शनविना पेपर लिहा

By admin | Updated: February 17, 2016 01:29 IST

डोक शांत ठेवलं की केलेला अभ्यास आठवेल... टेन्शन न घेता पेपर लिहिता येतो... आपल्याला पेपर अवघड जाणार नाही, असा सकारात्मक भाव ठेवल्यास परीक्षा उत्तमरीत्या पार करता येते

पुणे : डोक शांत ठेवलं की केलेला अभ्यास आठवेल... टेन्शन न घेता पेपर लिहिता येतो... आपल्याला पेपर अवघड जाणार नाही, असा सकारात्मक भाव ठेवल्यास परीक्षा उत्तमरीत्या पार करता येते, असा सल्ला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी यंदाची बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षाकाळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना फोनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यास राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी परीक्षेच्या संदर्भात जसे की परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंदर्भात प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)