शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

स्वच्छता राखा, आजार टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 05:58 IST

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

मुंबई : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरू झाल्यावर दूषित पाणी आणि डासांमुळे होणारे आजार डोके वर काढतात. ताप, सर्दी, खोकल्याबरोबर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, डायरिया, गॅस्ट्रो अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.पावसाळा सुरू झाल्यावर उघड्यावरचे अन्नपदार्थ, पाणी, यामुळे कावीळ, गॅस्ट्रो आणि डायरियाची लागण होण्याचा धोका असतो. या आजारांना रोखणे सहज शक्य आहे. दूषित अन्नपदार्थ आणि पाणी पिणे टाळल्यास, या आजारांना आळा घालता येऊ शकतो, तसेच अनेकदा घरी येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळूनआणि गाळून पिणे हा सर्वात सुरक्षित उपाय असल्याचे डॉ. वरदा वाटवेयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती होऊन डासांमुळे होणारे आजार बळावू शकतात. त्यामुळे डास चाऊ नयेत, म्हणून हात-पाय झाकले जातील, असे कपडे घाला. रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावा. रुग्णांना डास चावणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा. पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील, याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावा. आजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही, याची काळजी घ्या, तसेच उच्चभ्रू वस्त्या, इमारतींमध्ये डासांची पैदास होणाºया ठिकाणांचा शोध घ्या, असा सल्ला ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी दिला आहे.पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकलासारखा त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरकडे जा. तपासणी करून घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.कुठे साचून राहते पाणी?पावसाळ्यात पाणी फक्त घराबाहेर नाही, तर घरातही साचते. त्यामुळे घराची स्वच्छता महत्त्वाची आहे. घरात लावलेल्या झाडांच्या खाली ठेवण्यात येणाºया ताटल्या, फ्रीज, एसीचा डक, फेंगशुई प्लँट, शोभेची झाडे या ठिकाणी पाणी साचून राहते, तसेच घराबाहेर म्हणजे गच्चीवर, ताडपत्री, भंगाराच्या वस्तू, टायर, रिकामे डबे या ठिकाणी पाणी साचून राहते. सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वच्छ पाणी साचून राहिल्यास त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील आवाराची स्वच्छता केली पाहिजे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला पाहिजे. पावसाळी आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अतिशय आवश्यक आहे.पावसाळी आजार टाळा, ही काळजी घ्या!साचलेल्या दूषितपाण्यातून (प्राण्यांचे मूत्र, रक्त) चालणे टाळा.‘जोखीम’ गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखा.कचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत, याची काळजी घ्यावी.रहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही, याची काळजी घ्या. अन्नपदार्थ स्वच्छ जागीआणि झाकून ठेवावेत.साचलेल्या पाण्यातूनचालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.जास्त ताप,डोकेदुखी, डोळे लालहोणे, अशी लक्षणेआढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊनउपचार घ्यावेत.