शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

अधिकार नसताना केदारांनी दलाल नेमले

By admin | Updated: May 31, 2017 03:51 IST

नागपूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने अध्यक्ष सुनील केदार व महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांना रोखे व्यवहारासाठी

सोपान पांढरीपांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने अध्यक्ष सुनील केदार व महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांना रोखे व्यवहारासाठी दलाल नेमण्याचे कुठलेही अधिकार दिले नव्हते. तरीही केदारांनी आपल्या मर्जीतील दलालांची नेमणूक करून बँकेचे १४८ कोटींचे नुकसान केले, असे आता उघड झाले आहे.‘लोकमत’जवळ असलेल्या कागदपत्रांनुसार दि. २५ आॅगस्ट २००१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयात रोखे व्यवहाराचा मुद्दा चर्चेला आला व त्याला संचालक मंडळाने मंजुरी दिली व त्यासाठी अध्यक्ष सुनील केदार व महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांना अधिकार प्रदान केले.मजेची बाब म्हणजे, याच बैठकीत केदारांनी अशी माहिती दिली की, बँकेने तरलता निधी पूर्ततेसाठी सब्सिडिअरी जनरल लेजर (एसजीएल)मार्फत ७५ कोटींचे सरकारी रोखे घेतले आहेत. याशिवाय बँकेने होम ट्रेड सेक्युरिटीज या दलाल फर्ममार्फत १५० कोटीसुद्धा सरकारी रोख्यात गुंतविले आहेत.म्हणजे, दलाल नेमण्याचा अधिकार नसतानाच अध्यक्ष केदार यांनी पाच दलालांची नेमणूक करून त्यांचेमार्फत प्रत्यक्ष स्वरूपात रोखे व्यवहार सुरू करून टाकले होते व ही बाब संचालक मंडळापासून लपवून ठेवली होती. यामुळेच स्पेशल आॅडिटर यशवंत बागडे यांच्या चौकशी अहवालात रोखे घोटाळ्यासाठी २७ संचालकांपैकी फक्त अध्यक्ष सुनील केदार व महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांनाच जबाबदार ठरवून त्यांचेकडून अनुक्रमे १२६.७७ कोटी व २५.४० कोटी वसूल करावे, असा आदेश दिला होता. इतर २५ संचालक / अधिकाऱ्यांना निर्दोष घोषित केले होते.जिल्हा बँकेचे १४८ कोटींचे नुकसानरोखे घोटाळा करताना केदारांनी केवळ संचालकांनाच अंधारात ठेवले नाही, तर रिझर्व्ह बँकेच्या नियमांचेही उल्लंघन केले.रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कुठल्याही बँकेला रोखे व्यवहार करायचा असेल तर तो सब्सिडिअरी जनरल लेजर (एसजीएल)मार्फत करण्याचे बंधन आहे. ‘एसजीएल’ हे एक रजिस्टर असते व त्यात रोखे खरेदी-विक्रीचा प्रत्येक व्यवहार नोंदला जात असतो. एसजीएलमार्फत गेले तर रोखे खरेदी/ विक्री किंमत झालेला नफा, कितीवेळा रक्कम वापरली हे सर्व उघड होते व त्यात दलाल व बँक अध्यक्ष भ्रष्टाचार करू शकत नाहीत.साहजिकच एसजीएलमार्फत रोखे व्यवहार करणे केदारांच्या पथ्यावर पडणारे नव्हते म्हणून त्यांनी एसजीएल डावलून दलालांमार्फत प्रत्यक्ष स्वरूपात व्यवहार केले. यातील जोखीम माहीत असूनही केदारांनी रोखे व्यवहार केले व त्यात नागपूर जिल्हा बँकेचे १४८ कोटींचे नुकसान झाले. यासाठी केदार पूर्णत: जबाबदार आहेत.(उद्या वाचा : खटला लांबवण्यासाठी केदारांनी काय उचापती केल्या.)