शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीत कंत्राटी भरती

By admin | Updated: July 1, 2016 03:40 IST

परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत.

कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे ‘ठोक पगारी तत्त्वावर’ चालक व वाहकांची भरती करण्याचा ठराव केडीएमटीने राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने आता कंत्राटी पद्धतीवर चालक-वाहक नेमण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमात १८५ बस उपलब्ध होणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालक नसल्याने परिवहन उपक्रमाला नागरिकांना सेवा देण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे तातडीने ठोक पगारी तत्त्वावर ४५० वाहक आणि चालकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सरकारने वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी घातली आहे. त्यामुळे सरकारने केडीएमटीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव फेटाळला. केडीएमटीत बाह्ययंत्रणेकडून (आउट सोर्सिंग) पद्धतीने भरती करावी. तसेच कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली केडीएमटीच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले होते. त्यानुसार, उपक्रमाने गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्ताव दाखल केला होता. तो चर्चेला येताच सरकारचा यासंदर्भातील अध्यादेश समितीला सादर करावा, अशी मागणी करताना प्रशासनालाच कंत्राट नेमण्यात स्वारस्य असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, परिवहन समितीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांनी सरकारला पाठवला होता. परंतु, तो नामंजूर झाल्याचे पत्र सरकारने आयुक्तांना पाठवल्याची माहिती के डीएमटीचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)>कंत्राटदाराला तीन महिने मुदतवाढकंत्राटी पद्धतीने चालक व वाहक कर्मचारी देणाऱ्या जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराची मुदत गुरुवारी संपुष्टात आल्याने त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कंत्राटदार पुरेशा प्रमाणात चालक-वाहक पुरवत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.मुदत संपुष्टात येत असताना ऐनवेळी हा प्रस्ताव का आणला, हा समितीला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु, मुदतवाढ न दिल्यास बससेवा ठप्प होईल, या सदस्यांच्या भावना लक्षात घेता संबंधित कंत्राटाला तीन महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी स्पष्ट केले.