शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या २७ गावांना वगळणार की ठेवणार?

By admin | Updated: February 24, 2016 04:02 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळणार की ठेवणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ७ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळणार की ठेवणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ७ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सरकारने महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला या गावांतील काही नागरिकांनी विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना २७ गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. सरकारच्या या प्रस्तावाला स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रियेलाही स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. तर राज्य सरकारनेही गावे वगळण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणे लांबणीवर टाकले. मंगळवारच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सरकारच्या प्रस्तावात तथ्य राहिले नसल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी विनंती न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाकडे केली. ‘आता निवडणूक झाली आहे. या गावांतून २२ नगरसेवक निवडणूक आले आहेत. सरकारच्या या प्रस्तावामुळे नाहक या भागाचा विकास रखडेल. या गावांसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा आदेश द्यावा,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठापुढे केला.वादग्रस्त २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यासाठी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर काही नागरिकांनी ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)