शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

करप्रणालीवरून केडीएमसीत जुंपणार

By admin | Updated: June 12, 2014 04:16 IST

एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करून जकात लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी केली

कल्याण : एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करून जकात लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी केली असता प्रशासनाने मात्र एलबीटी हितकारक असल्याचे म्हटले आहे. यावर एलबीटी आणि जकातही नको, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने करप्रणालीवरून जुंपण्याची शक्यता आहे. या विषयावर १२ जून रोजी सायंकाळी प्रशासनाने बैठक बोलवली असून यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.एलबीटीला व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत केडीएमसीच्या महापौर पाटील यांनी जकात लागू करा, अशी मागणी केली. यासंदर्भात त्यांनी चव्हाण यांना निवेदनही सादर के ले. एलबीटी लागू केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा पाटील यांनी केला. महापालिका प्रशासनाने दाखवलेले एलबीटी वसुलीचे आकडे फुगीर आणि फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केडीएमसी क्षेत्रातून २७ गावे वगळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे एलबीटीला महापौरांचा विरोध दिसून आला असताना दुसरीकडे ही करप्रणाली पारदर्शी असून महापालिकेच्या आर्थिक हिताची आहे. परंतु, शासनाने एलबीटीऐवजी अन्य कोणतेही पर्याय सुचवले तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता एलबीटी केडीएमसीसाठी हितकारक असली तरी शासन जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. करप्रणाली लागू करण्यावरून प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद दिसून आले असताना एलबीटी नको आणि जकातही नको, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एलबीटी रद्द करून व्हॅटवर सरचार्ज लावण्याची आमची मागणी असल्याचे क ल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन आणि कल्याण व्यापारी महामंडळाचे सरचिटणीस विजय पंडित यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)