शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत मुख्यमंत्री पडले एकटे

By admin | Updated: November 6, 2015 02:19 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

- यदु जोशी , मुंबईकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा काही जणांचा प्रयत्न होता का, अशी शंकाही या निमित्ताने पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दादा भुसे आणि इतरही नेते सहा दिवस कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून होते, तसे भाजपाच्या एकाही मंत्र्याने केले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी काही सभा घेतल्या, पण त्यांच्यासह कोणत्याही मंत्र्याने या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसले नाही, असे आता म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षसंघटना कामाला लावली, पण ते स्वत: इतर ठिकाणच्या महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन प्रचार सभा, एक विकास परिषद आणि २७ गावांसाठीची सभा अशी पाच भाषणे दिली. विकास परिषदेत त्यांनी स्मार्ट सिटीची पद्धतशीर मांडणी केली आणि निवडणुकीची सूत्रे स्वत:कडे घेतली. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली म्हटल्यानंतर, इतर मंत्र्यांनी त्यांना साथ दिल्याचे दिसले नाही. शिवसेनेत मात्र उलट चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे, तर आता यशापयशाचे धनीही तेच ठरतील, हा विचार करून तर सुरक्षित अंतर राखले गेले नाही ना, अशी चर्चादेखील या निमित्ताने होत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतील संघ परिवाराने मनसेला साथ दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपाला बसला होता. यावेळी असे होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी संघाच्या स्थानिक धुरिणांशी बंदद्वार चर्चा केली. मात्र, भाजपमधील एका बड्या नेत्याच्या कल्याणमधील समर्थकाने तिकीटवाटपात संघ-भाजपानिष्ठांना डावलल्याने संघ परिवार सुरुवातीला प्रचंड नाराज होता.उपऱ्यांना संधी देण्यावरून परिवाराने प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती. असे घडवून आणण्यासाठी भाजपातील काही लोक पडद्याआडून सक्रिय होते का, अशी शंका आता घेतली जात आहे.