शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

केडीएमसीत मुख्यमंत्री पडले एकटे

By admin | Updated: November 6, 2015 02:19 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

- यदु जोशी , मुंबईकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा काही जणांचा प्रयत्न होता का, अशी शंकाही या निमित्ताने पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दादा भुसे आणि इतरही नेते सहा दिवस कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून होते, तसे भाजपाच्या एकाही मंत्र्याने केले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी काही सभा घेतल्या, पण त्यांच्यासह कोणत्याही मंत्र्याने या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसले नाही, असे आता म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षसंघटना कामाला लावली, पण ते स्वत: इतर ठिकाणच्या महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन प्रचार सभा, एक विकास परिषद आणि २७ गावांसाठीची सभा अशी पाच भाषणे दिली. विकास परिषदेत त्यांनी स्मार्ट सिटीची पद्धतशीर मांडणी केली आणि निवडणुकीची सूत्रे स्वत:कडे घेतली. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली म्हटल्यानंतर, इतर मंत्र्यांनी त्यांना साथ दिल्याचे दिसले नाही. शिवसेनेत मात्र उलट चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे, तर आता यशापयशाचे धनीही तेच ठरतील, हा विचार करून तर सुरक्षित अंतर राखले गेले नाही ना, अशी चर्चादेखील या निमित्ताने होत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतील संघ परिवाराने मनसेला साथ दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपाला बसला होता. यावेळी असे होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी संघाच्या स्थानिक धुरिणांशी बंदद्वार चर्चा केली. मात्र, भाजपमधील एका बड्या नेत्याच्या कल्याणमधील समर्थकाने तिकीटवाटपात संघ-भाजपानिष्ठांना डावलल्याने संघ परिवार सुरुवातीला प्रचंड नाराज होता.उपऱ्यांना संधी देण्यावरून परिवाराने प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती. असे घडवून आणण्यासाठी भाजपातील काही लोक पडद्याआडून सक्रिय होते का, अशी शंका आता घेतली जात आहे.