शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा

By admin | Updated: November 11, 2016 05:04 IST

महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा.

औरंगाबाद : महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा. आॅलिम्पिकसह राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवणाऱ्या कविता राऊत औरंगाबाद येथे पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी आली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता राऊत हिने २0१0 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १0 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळवला होता. तसेच तिने २0१0 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत १0 हजार मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखणाऱ्या कविता राऊत हिने १0 कि.मी. रोड रनिंग रेसमध्ये ३४.३२ अशी वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला होता. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कविता राऊत हिने आज पत्रकारांशी संवाद साधला.आॅलिम्पिकमध्ये देशाला अद्यापही पदकविजेती कामगिरी करता आली नसल्याची खंत तिने व्यक्त केली. याविषयी तिने बोलताना सांगितले, ‘खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतरच अद्ययावत सुविधा आणि चांगले प्रशिक्षक मिळतात. आॅलिम्पिकमध्ये पदकविजेते खेळाडू घडण्यासाठी जिल्हापातळीपासून आणि लहान वयापासूनच खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, मैदान अशा सुविधा मिळणे नितांत गरजेचे आहे. खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा मिळायला हवी, असे घडले तरच देशात पदक विजेते खेळाडू घडतील.’आपण ग्रामीण भागातून आलो आहोत. ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यासाठी पैसेही नसतात. आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांनीच देशासाठी पदकविजेती कामगिरी केली. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलींना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे तिने सांगितले. याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना कविता राऊतने खेळात शिस्त, आहार आणि सातत्य महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश दिला. (क्रीडा प्रतिनिधी)