शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा

By admin | Updated: November 11, 2016 05:04 IST

महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा.

औरंगाबाद : महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा. आॅलिम्पिकसह राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवणाऱ्या कविता राऊत औरंगाबाद येथे पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी आली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता राऊत हिने २0१0 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १0 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळवला होता. तसेच तिने २0१0 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत १0 हजार मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखणाऱ्या कविता राऊत हिने १0 कि.मी. रोड रनिंग रेसमध्ये ३४.३२ अशी वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला होता. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कविता राऊत हिने आज पत्रकारांशी संवाद साधला.आॅलिम्पिकमध्ये देशाला अद्यापही पदकविजेती कामगिरी करता आली नसल्याची खंत तिने व्यक्त केली. याविषयी तिने बोलताना सांगितले, ‘खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतरच अद्ययावत सुविधा आणि चांगले प्रशिक्षक मिळतात. आॅलिम्पिकमध्ये पदकविजेते खेळाडू घडण्यासाठी जिल्हापातळीपासून आणि लहान वयापासूनच खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, मैदान अशा सुविधा मिळणे नितांत गरजेचे आहे. खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा मिळायला हवी, असे घडले तरच देशात पदक विजेते खेळाडू घडतील.’आपण ग्रामीण भागातून आलो आहोत. ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यासाठी पैसेही नसतात. आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांनीच देशासाठी पदकविजेती कामगिरी केली. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलींना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे तिने सांगितले. याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना कविता राऊतने खेळात शिस्त, आहार आणि सातत्य महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश दिला. (क्रीडा प्रतिनिधी)