शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा

By admin | Updated: November 11, 2016 05:04 IST

महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा.

औरंगाबाद : महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा. आॅलिम्पिकसह राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवणाऱ्या कविता राऊत औरंगाबाद येथे पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी आली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता राऊत हिने २0१0 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १0 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळवला होता. तसेच तिने २0१0 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत १0 हजार मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखणाऱ्या कविता राऊत हिने १0 कि.मी. रोड रनिंग रेसमध्ये ३४.३२ अशी वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला होता. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कविता राऊत हिने आज पत्रकारांशी संवाद साधला.आॅलिम्पिकमध्ये देशाला अद्यापही पदकविजेती कामगिरी करता आली नसल्याची खंत तिने व्यक्त केली. याविषयी तिने बोलताना सांगितले, ‘खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतरच अद्ययावत सुविधा आणि चांगले प्रशिक्षक मिळतात. आॅलिम्पिकमध्ये पदकविजेते खेळाडू घडण्यासाठी जिल्हापातळीपासून आणि लहान वयापासूनच खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, मैदान अशा सुविधा मिळणे नितांत गरजेचे आहे. खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा मिळायला हवी, असे घडले तरच देशात पदक विजेते खेळाडू घडतील.’आपण ग्रामीण भागातून आलो आहोत. ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यासाठी पैसेही नसतात. आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांनीच देशासाठी पदकविजेती कामगिरी केली. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलींना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे तिने सांगितले. याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना कविता राऊतने खेळात शिस्त, आहार आणि सातत्य महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश दिला. (क्रीडा प्रतिनिधी)