शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहात येईल

By admin | Updated: February 26, 2017 00:33 IST

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला

पुणे : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला यश मिळत आहे. त्यामुळे काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला.सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूह शह, फलोत्पादन विभागाचे संचालक महंमद हसन मीर, संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, सरहदचे संजय नहार आणि शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.रमेश म्हणाले, ‘काश्मीरमधील अशांततेचे वातावरण निवळून शांती आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. दहावी अनुत्तीर्णांना प्रशिक्षण आणि रोजगार देणारी ‘हिमायत’, काश्मीरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’ या योजना सुरु केल्या होत्या. हे करताना घटनात्मक जबाबदारी पूर्ण करत असल्याची भावना सरकारमध्ये होती. राज्य सरकारच्या पर्यटन विभागानेही सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करण्यासाठी रोड शो सुरु केले आहेत. परंतु, सगळे काम सरकार करु शकणार नाही. त्यासाठी सरहदसारख्या संस्थांचे योगदान महत्वाचे आहे.’‘गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. पूर्वी काश्मीरला गेल्यावर गुजराती आणि बंगाली ऐकायला मिळायचे. मात्र, आता मराठी बोलणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. हे पाहून खूप आनंद होतो’, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)दमादम मस्त कलंदर...काश्मीरमधील लोकप्रिय गायक शफी सोपोरी आणि शमीमा अख्तर यांनी काश्मिरी, हिंदी गीतांसह सुफी रचना सादर करून महोत्सवाची शान वाढवली. ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या हिंदी गीतांसह ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्यांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद दिली.