शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहात येईल

By admin | Updated: February 26, 2017 00:33 IST

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला

पुणे : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला यश मिळत आहे. त्यामुळे काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला.सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूह शह, फलोत्पादन विभागाचे संचालक महंमद हसन मीर, संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, सरहदचे संजय नहार आणि शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.रमेश म्हणाले, ‘काश्मीरमधील अशांततेचे वातावरण निवळून शांती आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. दहावी अनुत्तीर्णांना प्रशिक्षण आणि रोजगार देणारी ‘हिमायत’, काश्मीरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’ या योजना सुरु केल्या होत्या. हे करताना घटनात्मक जबाबदारी पूर्ण करत असल्याची भावना सरकारमध्ये होती. राज्य सरकारच्या पर्यटन विभागानेही सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करण्यासाठी रोड शो सुरु केले आहेत. परंतु, सगळे काम सरकार करु शकणार नाही. त्यासाठी सरहदसारख्या संस्थांचे योगदान महत्वाचे आहे.’‘गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. पूर्वी काश्मीरला गेल्यावर गुजराती आणि बंगाली ऐकायला मिळायचे. मात्र, आता मराठी बोलणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. हे पाहून खूप आनंद होतो’, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)दमादम मस्त कलंदर...काश्मीरमधील लोकप्रिय गायक शफी सोपोरी आणि शमीमा अख्तर यांनी काश्मिरी, हिंदी गीतांसह सुफी रचना सादर करून महोत्सवाची शान वाढवली. ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या हिंदी गीतांसह ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्यांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद दिली.