शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

काश्मीर पेटतेय; मोदी विदेशात ढोल पिटतात

By admin | Updated: July 15, 2016 00:28 IST

इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे

आळंदी : इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे. इतर देशांचे नेते विदेश दौऱ्यावर असताना अशी घटना घडल्यास तत्काळ देशात दाखल होतात, तर आपले पंतप्रधान काश्मीर पेटत असताना विदेशात ढोल पिटत होते, अशी परखड टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह यांनी येथे केली.पुणे जिल्ह्यातील आळंदी (ता. खेड) येथे माउलींचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. दिग्विजय सिंह म्हणाले, की गंगा स्वच्छतेचे श्रेय घेऊ पाहत असलेले भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मुळात गंगा स्वच्छतेचा कार्यक्रम काँग्रेस सत्तेवर असताना घेतला गेला आहे. सालाबादप्रमाणे माउली दर्शनासाठी आज गुरुवारीदेखील सिंह पत्नी अमृता सिंह यांच्यासमवेत दाखल झाले. त्यांचा नगरपालिका चौकात आळंदी शहर काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करत पुष्पहार घालून सत्कार केला. तदनंतर ते माऊली मंदिरात दाखल झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस अभिषेक व पूजा करत त्यांनी दर्शन घेतले. यशवंत हाप्पे, संजय उभे, नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, डॉ. मनोज रांका, बाळासाहेब रावडे, चेतन घुंडरे, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर शेटे, उमेश रानवडे, अविनाश बोरुंदीया, संजय वडगावकर, ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. (वार्ताहर)