शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेसाठी महत्वाचा - शरद यादव

By admin | Updated: August 21, 2016 18:15 IST

काश्मीरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा.काश्मिरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २ : काश्मिरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा. काश्मीरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मीरसारख्या घरातील प्रश्नाला सोडविण्याकरीता प्राधान्य द्यायला हवे, असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी सांगितले. दरम्यान, उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये सध्या तरी एकटे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर यादव यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीर प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, काश्मिर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होत आहे. सरकार सोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे. हा घरातील प्रश्न असून सरकारने त्यासाठी अधिक प्राधान्य द्यायला हवे. देशातील जातीव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीदेखील बदल झालेला नाही. यामुळे देश कमजोर होत असल्याचे चित्र आहे. आपले पंतप्रधान गोरक्षणाची चर्चा करतात, परंतु आज देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

देशातील भ्रष्टाचार वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळ्याची घटना घडली. यामध्ये मजूरांचे प्राणही गेले. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आला. या घटनांवरुन बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अच्छे दिन आले आहेत, असे म्हणताना देशाची स्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीपेक्षा वाईट झाल्याचे दिसते, असे यादव यांनी नमुद केले.