शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

काश्मिरचा मुद्दा संपला आता विषय केवळ पाकव्याप्त काश्मिरचा : केंद्रिय गृहराज्यमंत्री

By admin | Updated: August 21, 2016 18:57 IST

किस्तानसमोर आता काश्मिरऐवजी केवळ पाकव्याप्त काश्मिरचा विषय शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी (दि़२१) नाशिकमधील पत्रकार परीषदेत दिली़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २१ : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही़ प्रत्येक वेळी काश्मिरचा मुद्दा उपस्थित करून भारतात दहशतवादी कारवाई करणाऱ्या पाकिस्तानसमोर पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा उपस्थित करून त्यांचा चर्चेचा विषयच बदलून टाकला आहे़.  त्यामुळे पाकिस्तानसमोर आता काश्मिरऐवजी केवळ पाकव्याप्त काश्मिरचा विषय शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी (दि़२१) नाशिकमधील पत्रकार परीषदेत दिली़देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय मंत्री व खासदारांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना भेट देण्यास सांगितले होते़ त्यानुसार नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर व येवला येथील स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांचे स्मारकास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भेट दिली़ यानंतर शहर भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते़केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांना पत्रकारांनी काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेविषयी विचारले असता.

ते म्हणाले की, आतापर्यंत पाकिस्तान केवळ भारतातील काश्मिरच्या मुद्दा पुढे करून त्याबाबत चर्चा करीत होते़ काश्मिरबाबत पाकिस्तानची पुर्वीचीच भूमिका आजही कायम असली तरी आता पाकव्याप्त काश्मिरमधील बलुचिस्तानमधील नागरिकांनीच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी केली आहे़ बलुचिस्तानमधील नागरिकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधून काश्मिरबाबतच्या चर्चेचा विषयच बदलून टाकला आहे़

भारताची काश्मिरबाबत भूमिका स्पष्ट असून याबाबत पाकिस्तानचा लाडिकपणा यापुढे खपवून घेणार नाही़ पाकिस्तानची ताकद आम्ही ओळखून असून यापुर्वी तीन वेळा त्यांना भारताने धूळ चारली आहे़ पाकिस्तानने आपल्या ताकदीचा भारताविरोधी वापर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल़ तसेच आता चर्चेसाठी काश्मिरचा नव्हे तर पाकव्याप्त काश्मिरचा विषय असेल असेही अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ इसिसबाबत केंद्र गंभीर देशभरातील केरळ तसेच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील इसिसचा फैलावाबाबत केंद्रसरकार गंभीर आहे़ महाराष्ट्रातील मराठवाडा व परभणीतील इसिसच्या प्रभावाबाबतचा अहवाल राज्यसरकारकडून मागविण्यात आला आहे़ यामध्ये राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे तथ्य आढळल्यास केवळ राज्याचीच नव्हे तर केंद्राची संपूर्ण तपासी यंत्रणा याचा मूळापर्यंत शोध घेईल़ तसेच जी कुटुंबे इसिसच्या प्रभावाखाली असतील त्यांना यातून संपूर्णत: बाहेर काढेपर्यत हे काम सुरू राहणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले़