शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘कसाबसह लादेन’ची हजेरी

By admin | Updated: November 20, 2015 02:33 IST

पामबीच रोडवरील महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीमध्ये चक्क मुंबई हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला दहशतवादी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

पामबीच रोडवरील महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीमध्ये चक्क मुंबई हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला दहशतवादी अजमल कसाब, ओसामा बिन लादेन यांच्या नावाची नोंद आढळून आली आहे. हायअ‍ॅलर्ट असतानाही वाहनांची तपासणी होत नसून प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरही बंदच आहेत. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्येही हायअ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर २०० कोटी रुपये खर्च करून भव्य मुख्यालय बांधले आहे. गत महिन्यामध्ये मुख्यालय उडविण्याची धमकी पत्राद्वारे महापौर सुधाकर सोनावणे यांना दिली होती. परंतु यानंतरही सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षा वाढविल्याचे लक्षात यावे यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. सुरक्षा व्यवस्थेमधील मनुष्यबळ वाढले असले तरी प्रत्यक्षात मात्र सुरक्षा रामभरोसेच आहे. वाहनांमधून येणाऱ्या साहित्याची तपासणी होत नाही. कोणीही कोणतीही वस्तू आतमध्ये घेवून जात आहे. एखादी वस्तू आतमध्ये घेवून जायचे असेल तर त्या वस्तूची नोंदच होत नाही. मुख्यालयामध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. परंतु या रजिस्टरमध्ये कोणी काय लिहिले हेही पाहिले जात नाही. गुरुवारी दिवसभरात जवळपास ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी मुख्यालयास भेट दिली आहे. त्यांची नोंद रजिस्टरमध्ये केली आहे. या यादीमध्ये मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब सव्वाएक वाजता कार्यकारी अभियंता संजय देसाई यांना भेटण्यासाठी आल्याची नोंद झाली आहे. यानंतर १४६ क्रमांकावर अमेरिकेने ठार केलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनची नोंद झाली आहे. लादेन पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आल्याचे नोंदवहीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे पालिकेमधील सुरक्षा रक्षक व पोलीस किती निष्काळजीपणे काम करीत आहेत हे स्पष्ट होत आहे. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे. पोलीस करतात आराममुख्यालयामध्ये बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारीही तैनात केले आहेत. परंतु हे सर्व कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर खुर्च्या टाकून बसत आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सुरक्षा रक्षक बोर्डाचे कर्मचारी व खाजगी सुरक्षा एजन्सीच्या गार्डवर सर्व जबाबदारी सोपविण्यात आली असून पोलीस दिवसभर आराम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सामान्यांना त्रासमहापालिकेमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नाही. कोण कशासाठी वाहन घेवून आतमध्ये आले याची नोंदच होत नाही. येथील सुरक्षा रक्षक फक्त पायी चालत येणाऱ्यांची तपासणी करत असल्याचे भासवत आहेत.वास्तविक कोणत्याच नागरिकाकडील साहित्याची व्यवस्थित पाहणी केली जात नाही. गुरुवारी महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आर. एस. रसनबहिरे हे अनेकांशी उद्धट वागत होते. सुरक्षा रक्षक बोर्डाचे कर्मचारी व मुख्य गेटवरील शिर्के व खराडे हे चांगले काम करत असले तरी एकूण यंत्रणाच ढिसाळ असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. चाकू, पिस्तूलही मुख्यालयात : महापालिकेच्या गेटवर व्यवस्थित तपासणी होत नाही. आज चक्क चाकू घेवून दोन व्यक्ती आतमध्ये गेल्या. त्यांची बॅगही तपासली पण चाकू सापडला नाही व मेटल डिटेक्टरचाही काहीच उपयोग झाला नाही. अनेक ठेकेदार व राजकीय पदाधिकारी पिस्तूल घेवून मुख्यालयात येत असतात पण त्याची काहीच माहिती सुरक्षा विभागाकडे नसते.