शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

By admin | Updated: September 9, 2016 17:56 IST

आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
कपिल शर्मांनी मुंबई महापालिकेच्या अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून केली काय, नी लगेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शर्मांच्या आलिशान इमारतीच्या बांधकामप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्याचा दावा शर्मांनी केला आहे.
शर्माजी, महाराष्ट्रातली जनता असंख्य कैफियती घेऊन मंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, जागांच्या भावांचे प्रश्न असे सगळे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांची तंत्रज्ञानाप्रती असलेली रूची बघून अनेकांनी ट्विटर अकाउंट्सपण उघडली आणि जनतेच्या कैफियती मांडत मुख्यमंत्र्यांना टॅग पण केलं. पण, तक्रारीची दखल किंवा रिट्विट तर सोडा, साधं लाइकपण ते करत नाही हो..! 
पण तुम्ही एक कैफियत काय मांडली सगळं मंत्रालय नी मुंबई महापालिकेची फोर्टातली इमारत कामाला लागली की हो! 
तर आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना! माध्यम काही असो, व्यथांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं महत्त्वाचं, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता यावर आमचा विश्वास बसला आहे.
तर, शर्मासाहेब राज्याच्या जनतेच्या काही व्यथा देत आहोत, बघा जरा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वशिला लावता आला तर...
 
- कांद्याचा भाव कधी 2 रुपये किलो होतो तर कधी 100... एकतर शेतकरी भरडून निघतो किंवा ग्राहक. मध्यम भाव स्थिर करता येईल असं काही करता येईल का, एवढं जरा विचारा ना फडणवीस साहेबांना? 
 
- राज्याचं शिक्षणक्षेत्र म्हणजे खेळ झालाय साहेब. कारण क्रीडामंत्रीच आमचे शिक्षणमंत्री आहेत. नीटवरून झालेला घोळ ताजा आहेच... आता थेट पुढच्या वर्षी पुन्हा असाच घोळ होईल नीटपणे... विधी किंवा कायद्याच्या पहिल्या वर्षाच्या अॅडमिशन अजून झालेल्या नाहीत. इतर कॉलेजांमधलं एक सत्र संपत आलं. ती सगळी मुलं लॉच्या भावी विद्यार्थ्यांना हसतायत, तुमच्या शोमधल्या प्रेक्षकांसारखी. मुख्यमंत्र्यांना जरा सांगा की शिक्षण हे महत्त्वाचं क्षेत्र आहे, जरा सीरियसली घ्या की हे खातं.
 
- मुंबईत तुम्ही इमारत बांधताय... पण तुम्हाला माहित्येय का इथल्या भूमीपुत्राला वन रूम किचन नाही परवडत या शहरात... आता बदलापूर नी वसईपण खिशाबाहेर चाललेत नी इथला माणूस आता कर्जत नी विरारच्याबाहेर फेकला जातोय.
मुख्यमंत्र्यांकडे जरा शब्द टाकून जागांचे भाव उतरतील असं काही तरी करा की... तुम्ही हे केलंत ना शर्मासाहेब... तर हे लाखो लोकं, कम्प्युटरवर तुमचाच स्क्रीन सेव्हर ठेवतील आणि झोपले तरी कॉमेडी विथ कपिल शर्मा बंद न करता तुमचा टीआरपी वाढता ठेवतील.
- शर्माजी आमच्या पोलीसांवर लाचखोरीचे आरोप होतात, दंडेलशाहीचेही आरोप होतात. पण तुम्हाला खरं सांगू का, ते किती तास काम करतात, कधी झोपतात, काय खातात पितात, त्यांचं कुटुंब कसं वाढतं, पोरांना दिवसेंदिवस बापाचं तोंडदेखील बघायला मिळत नाही, रहायला पक्की घरं नाहीत, घरी गणपतीचं दर्शन घेता येत नाही आणि सार्वजनिक गणेशाला सुरक्षा पुरवावी तर मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करतात. दहशतवादी एके-47 घेऊन येतात, नी आमचे पोलीस दंडुके घेऊन त्यांच्याची लढतात.
सगळ्या सरकारांनी पोलीसांना एवढी आश्वासनं दिलीयत ना, तेवढी तर 2014 मध्ये मोदीसाहेबांनी पण दिली नव्हती. तर, पोलीसांना चांगली घरं द्या, मुलांना शिक्षण द्या, नोकऱ्या द्या, भरती करताना पोरांची काळजी घ्या... (अति धावडवल्यामुळे रिकाम्या पोटी पोरांचे जीव गेलेत हे तुम्ही ऐकलं असेलंच.) आणि मुख्य म्हणजे संख्या वाढवा म्हणजे एका वेळच्या जेवणाला तरी ते घरी जाऊ शकतील.... 
त्यांना म्हणावं, शेकडो प्रकारचे अधिभार लावले आहेत ना आमच्या माथी... पोलिसांच्या कल्याणासाठी हवं तर आणखी एक अधिभार लावा...एवढं जरा तुम्ही आवर्जून सांगाच, मुख्यमंत्र्यांना...
यादी तर इतकी मोठी आहे ना शर्माजी की तुमचा कॉमेडी विथ कपिलचा रडारडी विथ कपिल होईल... पण एक आणखी महत्त्वाची मागणी तेवढी त्यांच्या कानावर घालाच...
त्यांना म्हणावं, जसं सेलिब्रिटींचा टिवटिवाट तुम्ही लक्ष घालून बघता ना, तसंच जरा स्थानिक वृत्तपत्रांवर पण अधेमधे नजर टाका म्हणजे रस्त्यांची स्थिती, महागाई, अनधिकृत बांधकामं, गुन्ह्यांचं व विशेषत: महिलांच्या व ज्येष्ठ नागिरकांच्या विरोधातील गुन्ह्याचं वाढतं प्रमाण अशा अनेक बाबी त्यांच्या ध्यानात येतील. जराशा विनोदी अंगानं, बोलता बोलता जमलंच तर... तुमच्याकडे गृहखातंही आहे अशी आठवणपण करून द्या त्यांना. काय आहे सणासुदीच्या काळात इतकी धामधूम असते की विसरायला होतात काही गोष्टी...