शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

कापसेंनी कापले पटवारींचे तिकीट?

By admin | Updated: August 4, 2016 02:42 IST

१९९०च्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण विधानसभा मतदारसंघातून एकमुखाने माझे नाव नक्की झाले होते.

डोंबिवली : १९९०च्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण विधानसभा मतदारसंघातून एकमुखाने माझे नाव नक्की झाले होते. तशी शिफारस केल्याची माहिती मला राम कापसे यांनीच दिली होती. पण, आयत्या वेळी माझ्याऐवजी जगन्नाथ पाटील यांचे नाव घोषित झाले. माझा पत्ता कापण्यात आला, अशी खळबळजनक माहिती श्री.वा. तथा आबासाहेब पटवारी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. संधी असून, क्षमता असून आणि पक्षातून पाठिंबा असूनही अन्याय झाल्याची खंत पटवारी यांनी व्यक्त केली आहे. नववर्ष स्वागतयात्रेसारखा संस्कृतीचे दर्शन घडवणारा-राज्यातच नव्हे, तर देश-परदेशात गाजलेला नावीन्यपूर्ण उपक्रम, गणेश मंदिरातून नगराचे केलेले प्रतिनिधित्व, डोंबिवली नागरी सहकारी बँकेची स्थापना, टिळकनगर शाळेतील काम करत त्यांनी आपल्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन घडवले. पण, राजकारणाच्या क्षेत्राने हुलकावणी दिली, ती कायमचीच. लोकांमधून निवडून आलेले डोंबिवलीचे नगराध्यक्ष अशी ज्यांची ओळख आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामांतून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, कर्तबगारीचा ठसा उमटवला आहे, ज्यांनी जनसंघ ते भाजपा असा राजकारणाचा दीर्घ प्रवास अनुभवला आहे, अशा पटवारी यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करतानाच ‘सहस्रचंद्रदर्शन’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या मनातील खंत, उपेक्षा, घुसमट व्यक्त केली आहे. हे आत्मचरित्र २७ आॅगस्टला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रकाशित होते आहे. उमेदवारी डावलण्यामागे परिवाराच्या ब्राह्मणकार्डापेक्षा भाजपाचे आगरीकार्ड प्रभावी ठरल्याची त्यांच्या निकटवर्तीयांची भावना आहे. एकतर, राम कापसे लोकसभेवर असल्याने दुसरा ब्राह्मण उमेदवार नको, असा युक्तिवाद काहींनी त्या वेळी केला, तर कापसेंना विधानसभा-लोकसभा अशी दीर्घकाळ संधी न देता त्यांनाच बदला आणि आबासाहेबांना संधी द्या, असाही मतप्रवाह होता. शिवाय, कापसे यांना आपल्याच मतदारसंघात नवे राजकीय आव्हान नको होते, अशा कारणांमुळे आबासाहेबांचे तिकीट गेले आणि पक्षीय राजकारणातील त्यांच्या प्रगतीचे पंख कापले गेले, ते कायमचेच. आजवर या विषयावर गप्प असलेल्या आबासाहेबांनी आत्मचरित्रात मात्र ही खदखद व्यक्त केली आहे.पक्षातीत मैत्री असल्याने नकुल पाटील यांनी जाहीररीत्या खंत व्यक्त करत ‘आबासाहेबांना पक्षाने कुजवले’, अशी भावना व्यक्त केली होती. पण, पटवारी यांना पक्षाकडून पुन्हा तशी संधी मिळाली नाही. लोकांमधून निवडून येऊन नगराध्यक्ष झालेल्या या व्यक्तीला नंतर नगरसेवकपद देऊ केले गेले. ते मात्र त्यांनी नाकारले. संघाला विश्वासात घेणे गरजेचे/५>आबासाहेबांचे मौन निमंत्रणात व्यस्त ‘सहस्त्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्रातील प्रकरणांबाबत आबासाहेब तूर्त फारसे काही बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. आत्मचरित्राची छपाई सुरू आहे. एकदा ते प्रकाशकांकडे दिले की पुढील जबाबदारी त्यांची, असे मोघम उत्तर देत ते त्याची उत्सुकता कायम ठेवतात. डोंबिवलीत सावित्रीबाई फुले सभागृहात २७ आॅगस्टला संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रणात ते सध्या व्यस्त आहेत.