शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कापसेंना डावखरेंनी दाखवला होता कात्रजचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 03:37 IST

१९८८ साली कल्याणमध्ये अखिल भारतीय साहित्य संमलन घेण्याकरिता आपले सर्व राजकीय वजन खर्ची घातले होते.

मुरलीधर भवार,  

कल्याण-माजी खासदार दिवंगत राम कापसे यांनी १९८८ साली कल्याणमध्ये अखिल भारतीय साहित्य संमलन घेण्याकरिता आपले सर्व राजकीय वजन खर्ची घातले होते. मात्र ठाणे शहराचे तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांनी डावपेच खेळून साहित्य संमेलन ठाण्यात घेतले. त्यामुळे त्यानंतर गेली २८ वर्षे कल्याणला पुन्हा संधी मिळालेली नाही. कल्याणमधील सुसंस्कृत राजकीय नेते अशी ओळख असलेल्या राम कापसे १९८८ साली आमदार होते. कापसे हे रुपारेल महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यांचा मराठी साहित्य हाच अभ्यासाचा विषय होता. मराठी साहित्याचे सौंदर्य शास्त्र हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ््याचा विषय होता. कापसे व्यासंगी होेते. त्यांचे वाचन दांडगे होते. त्यांनी १९८८ साली कल्याणमध्ये आखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या मागणीला त्यावेळचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद केसकर आणि बाबा यार्दी यांनी पाठिंबा दिला होता.मात्र ठाण्याचे तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांना कापसे यांच्या साहित्य संमेलन आयोजनाची कुणकुण लागताच हे संमेलन कुठल्याही परिस्थितीत कल्याण ऐवजी ठाण्यात घेण्याचे डावपेच ते खळले. त्यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम नाटककार वसंत कानेटकर होते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधातून डावखरे यांनी संमेलन ठाण्यात होईल, याचा बंदोबस्त केला. डावखरेंच्या राजकीय वजनापुढे कल्याणचा टिकाव लागला नाही.डावखरे यांच्या राजकीय कुरघोडीमुळे कापसे निराश झाले. त्यांनी पुन्हा संमेलनासाठी हट्ट धरला नाही. त्यानंतर बराच काळ निघून गेला. आत्तापर्यंत पार पडलेल्या साहित्य संमेलनात सगळ््यात जास्त म्हणजे दहावेळा पुण्याला संमेलन पार पडले आहे. पुणे जिल्ह्यात आळंदी, सासवड आणि पिंपरी चिचवड याठिकाणीही संंमेलने पार पडली. मुंबईत सहावेळा संमेलन पार पडले. पुणे मुंबई सोडले तर अन्य शहरांना तो मान फारच कमी वेळा मिळाला आहे. त्यात काही शहरांचा विचारच केला गेलेला नाही. १९८८ साली ठाण्याने संमेलन पळवल्यानंतर पुन्हा २०११ साली ठाण्यात साहित्य संमेलन भरले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी हे संमेलन यशस्वी केले. २०१६ सालचे अखिल भारतीय नाट्य संमेलनही ठाण्यात पार पडले. यासाठी शिंदे यांचाच पुढाकार होता. कल्याण नगरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कल्याणला एक इतिहास आहे. कल्याणचे भारताचार्य वैद्य हे १९०८ साली पुणे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन कल्याणमध्ये घेण्याची मागणी सलग चारवेळा करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले तरच ते शक्य आहे. त्यांनी त्यांचे राजकीय वजन वापरल्यास ठाण्यानंतर आता कल्याणचे संमेलन शिंदे यशस्वी करु शकतात. शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तो लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे पुत्राच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द पालकमंत्री या साहित्य संमेलनाचेही पालकत्व स्वीकारणार का, ़याबाबत साहित्यप्रेमींना उत्सुकता आहे.