शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कन्याकुमारी गाठले १३ दिवसात !

By admin | Updated: March 27, 2015 00:29 IST

महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.

सहकारनगर : महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.ही मोहीम अनुभवी सायकलपटू उपेंद्र शेवडे यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. त्यांच्या सोबत असणारा त्यांचा मुलगा वेदांग, आनंद घाटपांडे या वेळीही मोहिमेत सहभागी होते. याखेरी सुहृद घाटपांडे, ओंकार ब्रह्मे, अद्वैत जोशी, नंदू आपटे, उमेश पवार आणि आशिष फडणीस हे मोहिमेचे सदस्य होते. सारसबाग येथील गजाननाचे दर्शन घेऊन मोहिमेची सुरवात केलीे. पहिलाच टप्पा हा १६५ किमीचा होता. खंबाटकी घाट; तसेच साताऱ्या जवळील खिंड पार करीत सायकलपटूंनी कराड गाठले.दुसऱ्या टप्प्यात निपाणी (११० किमी) आणि त्यानंतर धारवाड (१४५ किमी) असे टप्पे मोहिमेने घेतले. तिसऱ्या टप्प्यात सायकलस्वारांना वेगवान वारे आणि सातत्याने चढ उतार असलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागला. या रस्त्यात लागलेले दांडेलींचे सुरेख जंगल आणि येल्लापूरनंतर लागलेला २५ किमी अंतराचा घाट हे प्रमुख आकर्षण ठरले, अशी माहिती ओंकार ब्रह्मे यांनी दिली. अंकोला ते मारवंथे हे १३५ किमीचे अंतर पार केले. या टप्प्यात चढउतार तर बरेच होते खेरीज रस्ताही खराब असल्याने सायकलस्वारांना अडचणींचा सामना करावा लागला. किनारपट्टीच्या बाजूबाजूने मार्गक्रमण करीत मोहिमेने ११० किमी अंतर पार करीत मँगलोर गाठले. केरळमधील अप्रतिम निसगसौंदर्य, सुरेख किनारे, नारळी पोफळीच्या बागा, अद्यापही सुस्थितीत असलेले किल्ले आणि प्रसिद्ध मंदिरे यामुळे हा प्रवास अतिशय बहारीचा झाला, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा १०० किमी अंतर पार करून, सायकलस्वारांनी गुरुवायुरच्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेऊन दिवसाची सांगता केली.या वेळी मोहिमेतील सदस्यांचा आश्रमाच्या वतीने एक छोटेखानी सत्कार करण्यात आला. मोहिमेतील काही सदस्यांचे कुटुंबीयही या वेळी स्वागताला उपस्थित होते. या मोहिमे दरम्यान प्रचंड उन, घामाच्या धारा, दमणूक असे सर्व काही अनुभवले पण त्याहीपेक्षा मोहीम यशस्वी केल्याचा आनंद मोठा होता, असे आशिष फडणीस म्हणाले. (प्रतिनिधी)४ अकराव्या दिवशी ११० किमी अंतर पार करून, मोहीम चावरा येथे पोहोचली व बाराव्या दिवशी ९० किमी पार करून, तिरुवनंतपुरम गाठले. मोहिमेच्या शेवटच्या दिवशी १०० किमी अंतर पार करावे लागले; परंतु एका स्थानिक सणासाठी रस्ते बंद झाल्यामुळे, अक्षरश गल्लीबोळांतून वाट काढत सायकलस्वार कन्याकुमारी येथे पोहोचते झाले.