शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमार ही भाजपची देणगी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 25, 2016 08:42 IST

फडणवीस सरकारला लक्ष्य करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्हैया कुमारच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - सरकारमध्ये सहभागी असूनही सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या फडणवीस सरकारला लक्ष्य करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्हैया कुमारच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. कन्हैया कुमार ही भाजपची देणगी असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी कार्यक्रम करणा-या गटाचे नेतृत्व कन्हैयाने केले व त्याबद्दल राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला तुरुंगात पाठवले, पण राष्ट्रद्रोहाचा हा आरोपी झटपट जामिनावर सुटून बाहेर आला कसा हे एक राजकीय गौडबंगाल आहे. अशा आरोपाखाली लोक वर्षानुवर्षे तुरुंगात सडत आहेत. पण कन्हैया मात्र मोकाट सुटला. त्यामुळे आता त्याचे नरडे दाबून प्रसिद्धी स्टंट करण्याची योजना कशाला? असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
मोदी हे आता जागतिक नेते बनले असले तरी शेवटी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणूनच त्यांची ही जगभ्रमंती सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानची जनता दुष्काळाने होरपळत व तहान-भुकेने तडफडत असताना मोदी यांनी स्वदेशात राहून जनतेची फिकीर करावी असा सल्लाही मोदींना दिला आहे. 
 
अग्रलेखातील मुद्दे 
कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘‘भारतमाता की जय बोलणार नाही’’ अशी मग्रुरीची भाषा करणार्‍या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत. पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्‍न देशात विचारले जात आहेत. कन्हैयाचा गळा दाबलात, पुढे काय? हा प्रश्‍न त्यातलाच आहे. 
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी कार्यक्रम करणार्‍या गटाचे नेतृत्व कन्हैयाने केले व त्याबद्दल राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला तुरुंगात पाठवले, पण राष्ट्रद्रोहाचा हा आरोपी झटपट जामिनावर सुटून बाहेर आला कसा हे एक राजकीय गौडबंगाल आहे. अशा आरोपाखाली लोक वर्षानुवर्षे तुरुंगात सडत आहेत. पण कन्हैया मात्र मोकाट सुटला. त्यामुळे आता त्याचे नरडे दाबून प्रसिद्धी स्टंट करण्याची योजना कशाला? कन्हैया काल मुंबई-पुण्यात येऊन गेला. ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या कसुरीसाठी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला तसा बंदोबस्त कन्हैयासाठी ठेवून त्याची सभा होऊ दिली. सरकारला याबाबतीत ठोस निर्णय घेता आला असता, पण असे ठोस निर्णय फक्त हिंदुत्ववादी किंवा अखंड महाराष्ट्रवादी यांच्याच बाबतीत घेतले जातात हे दुर्दैव म्हणावे लागेल. 
 
कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही. अर्थात मोदी हे आता जागतिक नेते बनले असले तरी शेवटी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणूनच त्यांची ही जगभ्रमंती सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानची जनता दुष्काळाने होरपळत व तहान-भुकेने तडफडत असताना मोदी यांनी स्वदेशात राहून जनतेची फिकीर करावी या लोकभावना आहेत. देश टिकला तर आपले जागतिक स्तरावरचे नेतृत्व टिकेल. महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमधील २५६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असून तेथील तब्बल ३३ कोटी जनता दुष्काळाच्या फे-यात तडफडत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात पाण्याचा टिपूस नाही व तेथील जनतेने मुंबई-ठाण्यात स्थलांतर केले असून त्यांच्या झुणका-भाकरीची सोय जमेल तशी शिवसेनेने केली. आपली भावंडे, पोरं-बाळं, आया-बहिणी उपाशी असताना शिवसेनेच्या घशाखाली तरी घास कसा उतरेल? मराठवाड्यात दोन-दोन महिने पाणी मिळत नाही. या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवस काढले असते तर बरेच झाले असते. सध्या त्यांचे निवडणूक दौरेही जोरात आहेत. आसाम, पश्‍चिम बंगालातही मोदीसाहेब प्रचार सभा घेत आहेत, पण महाराष्ट्राचा आक्रोश ऐकून ते येथे पोहोचू शकले नाहीत हे दु:ख मराठवाड्याच्या मनात खदखदत आहे व कन्हैयाकुमारसारख्या टिनपाटांना त्यामुळे बोलायला विषय मिळाला आहे.
 
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करावी अशी लायकी कन्हैयाची नाही, पण कन्हैयाची मूर्ती घडवून त्यात राजकीय प्राण फुंकणारे कोण, त्याचे आत्मपरीक्षण भाजपने केले तर बरे होईल. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखवली ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. देशात अच्छे दिन आणणार, विदेशातील काळा पैसा परत आणणार, वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करणार अशा अनेक घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विकल्या होत्या, पण पंतप्रधान झाल्यावर त्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. आता मोदी यांनाच लोक ‘ओएलएक्स’वर विकतील अशी वायफळ भाषा कन्हैयाकुमारने केली आहे. कन्हैयाकुमारचा बोलवता धनी कुणी वेगळाच असावा असे आता वाटू लागले आहे. मराठवाड्यातील भयंकर दुष्काळासंदर्भात कन्हैयाचे बोलणे योग्य आहे, पण मराठवाड्याचे अश्रू पुसायला शिवसेना धावपळ करते आहे. कन्हैयासारखे येतील व जातील, पुढे काय? तसेच त्याचे नरडे दाबूनही उपयोग नाही. कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘‘भारतमाता की जय बोलणार नाही’’ अशी मग्रुरीची भाषा करणार्‍या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत. पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्‍न देशात विचारले जात आहेत. कन्हैयाचा गळा दाबलात, पुढे काय? हा प्रश्‍न त्यातलाच आहे.