शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पतंगरावांचा खाऊ अन् उदयनराजेंचा झाला बाऊ..!

By admin | Updated: January 15, 2017 04:17 IST

‘सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला,’ ही ओळख इतिहासजमा करण्यासाठी चारही बाजूने विरोधकांची सशस्त्र फौज मोठ्या त्वेषाने तटबंदीवर तुटून पडलेली असतानाच, खुद्द गडावरच्या

- सचिन जवळकोटे

‘सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला,’ ही ओळख इतिहासजमा करण्यासाठी चारही बाजूने विरोधकांची सशस्त्र फौज मोठ्या त्वेषाने तटबंदीवर तुटून पडलेली असतानाच, खुद्द गडावरच्या राजेंनीच आतील कोठारात सुरुंग उडवायला सुरुवात केलीय. म्हणूनच की काय, थोरल्या बारामतीकरांच्या सोहळ््यात ‘पतंगरावांचा खाऊ अन् उदयनराजेंचा बाऊ,’ गाजला.गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीला जे काही दोन-तीन जोरदार हादरे बसलेत, त्या धक्क्यातून नेतेमंडळी सावरण्याची चिन्हे काही दिसेनात. पक्षाच्याच कृषी सभापतींविरोधात दाखल केलेला राष्ट्रवादीचा अविश्वास ठराव बहुमताअभावी बारगळला. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असतानाही, पतंगरावांचे बंधू अन् कॉँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम नाकावर टिच्चून निवडून आले. ... अन् हीच भळभळती जखम कुरवाळत शरद पवारांनी चार दिवसांपूर्वी साताऱ्याच्या मेळाव्यात आपला विषाद प्रकट केला. कार्यकर्त्यांनी ‘पतंगरावांचा खाऊ’ खाल्ल्यामुळे विधानपरिषदेचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करतानाच, ‘पक्षाच्या मुळावर उठलेल्यांना बाजूला सारा!’ असा आदेशही त्यांनी दिला. या मेळाव्यातील साऱ्या नेत्यांची भाषणे ऐकताना, ‘यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा आपला विरोधक नसून, कट्टर शत्रू केवळ पक्षाचे खासदारच आहेत,’ असा साक्षात्कारही तमाम कार्यकर्त्यांना झाला. एवढा उदयनराजेंच्या ‘कार्यकर्तृत्वाचा बाऊ’ झालाय. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अन् उदयनराजे यांच्यातील वैयक्तिक ईर्ष्येच्या वणव्यात अख्खा राष्ट्रवादी पक्ष होरपळून निघत असतानाच, बाहेरून यात तेल ओतण्याचे महत्तकार्य काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हेही इमाने-इतबारे करताहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर चवताळलेले जयकुमार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तुटून पडलेत. एके काळी रामराजे अन् दिवंगत आमदार चिमणराव कदम यांच्यातील कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवर रामराजे अन् जयकुमारांचे वाक्युद्ध गेलेय. उदयनराजेंच्या कॉलरवरून सुरू झालेली टीकाटिप्पणी, आता जयकुमारांच्या विजारीनंतर रामराजेंच्या नाड्यापर्यंत पोहोचलीय. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकूण ६२ जागांवर झेडपीची रणधुमाळी रंगतेय. खरे युद्ध राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्येच होणार असले, तरी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जातीने साताऱ्यात लक्ष घातल्याने भाजपाचाही जोर वाढल्याचे जाणवू लागलेय. शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे मात्र, नीरा नदी ओलांडून साताऱ्यात येण्याच्या मानसिकतेतच नसल्याने बावचळलेले अनेक शिवसैनिक ‘उद्धवा.. कोणता झेंडा घेऊ हाती?’ या विवंचनेत अडकलेत. अशातच सदाभाऊ खोतांना जिल्ह्याचे सहपालकमंत्री मिळाल्याने, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने काही मतदारसंघांत कामाला लागलेत. थोडक्यात, यंदाच्या झेडपीत चित्र वेगळे दिसण्याची दाट शक्यता बदलत्या वातावरणातून जाणवू लागलीय.उदयनराजेंचा स्वतंत्र ‘मराठा पक्ष’ अन् कार्यकर्त्यांचा दबाव..खासदार उदयनराजेंनी आता झेडपी निवडणुकीसाठी स्वतंत्र ‘राजधानी विकास आघाडी’ची घोषणा केलीय. त्यात शरद पवारांनी अशा नेत्यांना बाजूला करण्याची घोषणा केल्यानंतर, चंद्रकांत पाटलांनी उदयनराजेंना ‘भाजपा प्रवेशाचे आवतन’ दिलेय, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचाही राजेंना आतून पूर्ण पाठिंबा राहिलाय. त्यामुळे भविष्यात उदयनराजे ‘कमळ’ जवळ करणार की ‘हात’.. याची चर्चा सुरू झालीय, तसेच संपूर्ण राज्यात ‘मराठा क्रांती पक्ष’ नावाने स्वतंत्र पार्टी स्थापन्यासाठीही कार्यकर्त्यांकडून दबाव वाढू लागलाय. मात्र, ‘आपला राज ठाकरे होऊ नये!’ याची काळजी घेणारे हे राजे सध्यातरी शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकूनच ‘गनिमी कावा’ खेळताहेत... म्हणजे, पक्षात राहूनच पक्षातील ‘विरोधकांना कामाला लावण्याची व्यूहरचना’ आखताहेत.