शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कांदिवलीत अग्नितांडव, दोन हजार संसार उद्ध्वस्त

By admin | Updated: December 8, 2015 02:37 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सोमवारी दुपारी दोन हजारांहून अधिक संसार तासा-दोन तासांत उद्ध्वस्त झाले.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सोमवारी दुपारी दोन हजारांहून अधिक संसार तासा-दोन तासांत उद्ध्वस्त झाले. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाले आहेत. दामूनगर परिसरात राहणारी वस्ती ही हातावर पोट भरणारी आहे. मोलमजुरी करणारा हा कामगारवर्ग कामानिमित्त बाहेर पडला होता. शिवाय विद्यार्थीवर्गही शाळेत गेला होता. येथे लागलेली आग डोंगरमाथ्याहून खाली पसरल्याने स्थानिकांना सुरक्षितरीत्या आपला जीव वाचविता आला. त्यामुळे जीवित हानी टळली असली तरी राहती झोपडीच गेल्याने दोन हजारांहून अधिक कुटुंबांचे हाल सुरू झाले आहेत. या आगीत तब्बल ५० सिलिंडर्सचे स्फोट झाल्याचे बोलले जाते. त्याचमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर्स या झोपडपट्टीत आले कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहेत. अखेर दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. (प्रतिनिधी)आग लागली की...?पश्चिम उपनगरात झोपड्यांचे इमले उभे राहत आहेत. या झोपड्या अधिकृत की अनधिकृत हे पाहण्याचे काम महापालिका प्रशासनाचे. मात्र महापालिकेने याकडे कानाडोळा केला. परिणामी तिवरांची कत्तल करून झोपड्यांचे इमले उभे राहत आहेत. येथील झोपड्यांवर भू-माफियांचाही डोळा असून, दामूनगर झोपडपट्टीलगत समतानगर नावाची मोठी वस्ती आहे. सोमवारी लागलेल्या आगीनंतर समतानगरच्या जमिनीवर तर कुणाचा डोळा नाही ना, अशा शकांनी डोके वर काढले आहे.मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आगीने वेढले. या आगीची दाहकता एवढी होती की, यात दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. आग विझवण्यासाठी घटनास्थळी १६ फायर इंजिन, १२ पाण्याचे टँकर्स, १०८ क्रमांकाच्या ११ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या २ रुग्णवाहिका तातडीने पोहोचल्या