शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कल्याण गौरीपाड्यात दहा वेळा बत्ती गुल

By admin | Updated: July 19, 2016 03:19 IST

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

चिकणघर : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत २४ तासांत किमान दहा वेळा पुरवठा खंडित होत असल्याने त्रासातच भर पडली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधी उन्हाळ््याची कामे सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र सध्या कोणतेही कारण न देता पुरवठा खंडित होतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बारावे महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मे महिन्यापासून विजेचा दाब कमी-जास्त होण्याचे प्रमाण वाढल्याने विद्युत उपकरणे निकामी होत असल्याच्या तक्र ारीही नागरिकांनी केल्या आहेत.पावसाळ्यापूर्वी वाहिन्यांखालील वृक्षांची छाटणी झाली नसल्याचे आणि रोहित्रातील आॅईलची लेव्हल राखण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. विजेचा दाब १२० ते १५० व्होल्टपर्यंत खाली आल्यामुळे फ्रिड, टीव्ही, एसी ही उपकरणे चालत नाहीत. लाईट डीम झाल्याने रात्री अनेकदा ट्यूबही लागत नाहीत. हा त्रास रात्री खूप जाणवतो. याबाबत बारावे महावितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)