शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: August 3, 2016 03:08 IST

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

टीम लोकमत,

ठाणे- सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भरतीच्या वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदरच्या अनेक भागांत, खाडीकिनारी पाणी शिरले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबली. भातसा धरण ८६ टक्के भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदीकाठच्या ४१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असली तरी अद्याप कोठेही पूर आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा नदीतील पाणीपातळी वाढली आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कल्याणचा गणेशघाट, गांधारी परिसर, डोंबिवलीचा रेतीबंदर परिसर, कोपर स्थानकालगतचा भाग, मुंब्रा येथील खाडीकिनारा, दिव्यातील खाजण जमिनीवरील घरांचा परिसर, कल्याणचा वालधुनीचा पट्टा, उल्हासनगरला खेमाणी नाल्याचा पट्टा, बदलापूरला चौपाटीचा परिसर, टिटवाळ््यात काळू नदीवरील रूंदे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. वासुंद्री येथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय रिजन्सीचा परिसर पाण्याखाली गेला. टिटवाळा मंदिर रोड परिसरातही पाणी आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार नदीनाका येथे पावसाचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. म्हारळ गाव परिसरात पाणी शिरले. धरणे पाण्याने भरत असली तरी अद्याप पुराचा धोका नाही, असा निर्वाळा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरु राहिली आणि पुढील काळात धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तरी पुरासारखी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.भातसा ८६ टक्के भरले आहे. बारावी धरण ६६ टक्के भरले आहे. तानसा धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाकडील ११ लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. या तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहते आहे आणि आजूबाजूच्या शेती व परिसरात ते पसरत असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. मात्र हा विसर्ग खूपच कमी क्षमतेचा असल्याने त्यापासून कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. उल्हास नदीमध्ये आंध्र आणि बारवी धरणातून पाणी येते. या नदीतून वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी मोहने, जांभूळ व बदलापूर बॅरेज येथे मोजली जाते. सध्या तरी ती धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे. मात्र उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा आणि त्या परिसरातील पावसाचा जोर जास्त राहिला, तरच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऊ. ल. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)41 गावे सतर्कतेचा इशारा दिलेली >शहापूर : साजीवली, सरलांबे, कासगांव, तुटे, कवडास, सापगांव, बामणे, कुटघर, अंताड, हिव, काजळविहीर, मोहोपाडा, कलमपाडा, भातसई, वाशिंद, साने, पालीभिवंडी : कमालवाडी, सोर, वावली, वांदे, अटकले, भादणे, चित्रपाडा, अजुनली, पिसे, देवरंग, बाबगांव, चोरडपाडा, कोने आणि जंडजरकल्याण : सारसे, कोलस, ओझरली, कोडरी, सांगोडी, मोंडे, टिटवाला, अटली, आंबिवली आणि वडवली