शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: August 3, 2016 03:08 IST

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

टीम लोकमत,

ठाणे- सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भरतीच्या वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदरच्या अनेक भागांत, खाडीकिनारी पाणी शिरले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबली. भातसा धरण ८६ टक्के भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदीकाठच्या ४१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असली तरी अद्याप कोठेही पूर आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा नदीतील पाणीपातळी वाढली आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कल्याणचा गणेशघाट, गांधारी परिसर, डोंबिवलीचा रेतीबंदर परिसर, कोपर स्थानकालगतचा भाग, मुंब्रा येथील खाडीकिनारा, दिव्यातील खाजण जमिनीवरील घरांचा परिसर, कल्याणचा वालधुनीचा पट्टा, उल्हासनगरला खेमाणी नाल्याचा पट्टा, बदलापूरला चौपाटीचा परिसर, टिटवाळ््यात काळू नदीवरील रूंदे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. वासुंद्री येथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय रिजन्सीचा परिसर पाण्याखाली गेला. टिटवाळा मंदिर रोड परिसरातही पाणी आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार नदीनाका येथे पावसाचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. म्हारळ गाव परिसरात पाणी शिरले. धरणे पाण्याने भरत असली तरी अद्याप पुराचा धोका नाही, असा निर्वाळा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरु राहिली आणि पुढील काळात धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तरी पुरासारखी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.भातसा ८६ टक्के भरले आहे. बारावी धरण ६६ टक्के भरले आहे. तानसा धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाकडील ११ लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. या तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहते आहे आणि आजूबाजूच्या शेती व परिसरात ते पसरत असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. मात्र हा विसर्ग खूपच कमी क्षमतेचा असल्याने त्यापासून कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. उल्हास नदीमध्ये आंध्र आणि बारवी धरणातून पाणी येते. या नदीतून वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी मोहने, जांभूळ व बदलापूर बॅरेज येथे मोजली जाते. सध्या तरी ती धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे. मात्र उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा आणि त्या परिसरातील पावसाचा जोर जास्त राहिला, तरच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऊ. ल. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)41 गावे सतर्कतेचा इशारा दिलेली >शहापूर : साजीवली, सरलांबे, कासगांव, तुटे, कवडास, सापगांव, बामणे, कुटघर, अंताड, हिव, काजळविहीर, मोहोपाडा, कलमपाडा, भातसई, वाशिंद, साने, पालीभिवंडी : कमालवाडी, सोर, वावली, वांदे, अटकले, भादणे, चित्रपाडा, अजुनली, पिसे, देवरंग, बाबगांव, चोरडपाडा, कोने आणि जंडजरकल्याण : सारसे, कोलस, ओझरली, कोडरी, सांगोडी, मोंडे, टिटवाला, अटली, आंबिवली आणि वडवली