शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: August 3, 2016 03:08 IST

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

टीम लोकमत,

ठाणे- सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भरतीच्या वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदरच्या अनेक भागांत, खाडीकिनारी पाणी शिरले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबली. भातसा धरण ८६ टक्के भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदीकाठच्या ४१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असली तरी अद्याप कोठेही पूर आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा नदीतील पाणीपातळी वाढली आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कल्याणचा गणेशघाट, गांधारी परिसर, डोंबिवलीचा रेतीबंदर परिसर, कोपर स्थानकालगतचा भाग, मुंब्रा येथील खाडीकिनारा, दिव्यातील खाजण जमिनीवरील घरांचा परिसर, कल्याणचा वालधुनीचा पट्टा, उल्हासनगरला खेमाणी नाल्याचा पट्टा, बदलापूरला चौपाटीचा परिसर, टिटवाळ््यात काळू नदीवरील रूंदे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. वासुंद्री येथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय रिजन्सीचा परिसर पाण्याखाली गेला. टिटवाळा मंदिर रोड परिसरातही पाणी आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार नदीनाका येथे पावसाचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. म्हारळ गाव परिसरात पाणी शिरले. धरणे पाण्याने भरत असली तरी अद्याप पुराचा धोका नाही, असा निर्वाळा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरु राहिली आणि पुढील काळात धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तरी पुरासारखी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.भातसा ८६ टक्के भरले आहे. बारावी धरण ६६ टक्के भरले आहे. तानसा धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाकडील ११ लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. या तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहते आहे आणि आजूबाजूच्या शेती व परिसरात ते पसरत असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. मात्र हा विसर्ग खूपच कमी क्षमतेचा असल्याने त्यापासून कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. उल्हास नदीमध्ये आंध्र आणि बारवी धरणातून पाणी येते. या नदीतून वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी मोहने, जांभूळ व बदलापूर बॅरेज येथे मोजली जाते. सध्या तरी ती धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे. मात्र उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा आणि त्या परिसरातील पावसाचा जोर जास्त राहिला, तरच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऊ. ल. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)41 गावे सतर्कतेचा इशारा दिलेली >शहापूर : साजीवली, सरलांबे, कासगांव, तुटे, कवडास, सापगांव, बामणे, कुटघर, अंताड, हिव, काजळविहीर, मोहोपाडा, कलमपाडा, भातसई, वाशिंद, साने, पालीभिवंडी : कमालवाडी, सोर, वावली, वांदे, अटकले, भादणे, चित्रपाडा, अजुनली, पिसे, देवरंग, बाबगांव, चोरडपाडा, कोने आणि जंडजरकल्याण : सारसे, कोलस, ओझरली, कोडरी, सांगोडी, मोंडे, टिटवाला, अटली, आंबिवली आणि वडवली