शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कल्पना सरोज, मानबी बंडोपाध्याय साधणार संवाद

By admin | Updated: November 20, 2015 01:20 IST

महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कलर्स व्हायकॉम १८ प्रस्तुत ‘लोकमत वुमन समिट

पुणे : महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कलर्स व्हायकॉम १८ प्रस्तुत ‘लोकमत वुमन समिट २०१५’ एनईसीसीच्या सहयोगाने ‘लोकमत वुमन समिट’ हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संपूर्ण देशातील विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेली चार वर्षे सातत्याने विविध राष्ट्रीय पातळीवरील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. अधिक माहितीसाठी वाचत रहा लोकमत.डॉ. मानबी बंडोपाध्याय : डॉ. मानबी बंडोपाध्याय या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य ठरल्या आहेत. त्यांनी बंगाली साहित्यामध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली आहे. याआधी त्यांनी विवेकानंद सतोवार्षिकी महाविद्यालयात बांगला भाषेच्या सहायक प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. ‘ट्रान्सजेंडर लिटरेचर’ या विषयामधील पीएच.डी. मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी आहेत. ‘ओबो मानब’ हे तृतीयपंथींवरील पहिले मासिक बंडोपाध्याय यांनी प्रकाशित केले. बंडोपाध्याय यांनी २००३मध्ये नाव आणि लिंग बदलाचा निर्णय घेतला. त्यांची बंगाली भाषेतील ‘ओंतोहिन ओंतोरिन प्रोसितोवहोर्तिका’ (एंडलेस बाँडेज) ही कादंबरी सर्वाधिक खपाची ठरली. ‘थर्ड जेंडर इन बंगाली लिटरेचर’ या पुस्तकाच्याही मानबी बंडोपाध्याय या लेखक आहेत.जेसी पॉल : जेसी पॉल या पॉल रायटर या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. आयआयएममधून एमबीएचे शिक्षण घेतलेल्या पॉल मार्केटिंग क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्या इन्फोसिस कंपनीच्या जागतिक पातळीवरील ब्रँड व्यवस्थापक होत्या. विप्रो कंपनीच्या मुख्य विपणन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे ‘नो मनी मार्केटिंग’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. भारतातील मार्केटिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या हेतूने जेसी पॉल यांनी २०१०मध्ये पॉल रायटरची स्थापना केली. ही कंपनी सल्लागार सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवते. पॉल या एसएसक्यू इंडिया बीएफएसएल लिमिटेडच्या संचालिका म्हणूनही काम पाहतात.कल्पना सरोज : कल्पना सरोज या कमानी ट्यूब्ज लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्यांना २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये जन्मलेल्या कल्पना सरोज यांचे जीवन हे अनेक खाच-खळगे आणि आडवळणांनी भरलेले आहे. बालवधू ते एका कंपनीच्या संचालिका असा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. वैैयक्तिक आणि कौैटुंबिक अडचणींवर मात करीत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. कल्पना सरोज ग्रुप आॅफ कंपनीच अंतर्गत सध्या कल्पना या १० कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात. याआधी त्यांनी राष्ट्रीय एकता युवा मंच, सुशिक्षित बेरोजगार मंडळ अशा सामाजिक संस्थांचे, तसेच कल्पना सरोज विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. सरोज यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक बौैद्ध परिषदांचे आयोजन केले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि उन्नतीसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार, लंडनचा महापौैर पुरस्कार, समता पर्व, कल्याण मित्र असे अनेक सन्मान लाभले आहेत. सध्या त्यांनी आॅक्सफर्ड सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजसह नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक कार्याच्या चळवळीसाठी त्यांनी २१हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत.