शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘काळू-बाळू’चा तमाशा बंद!

By admin | Updated: March 11, 2016 03:55 IST

येथील अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा बंद पडला आहे. तब्बल पाच दशके या कलाप्रकारात हुकूमत गाजविणारा हा तमाशा दुष्काळी स्थिती व आर्थिक

सचिन लाड, सांगलीकवलापूर (ता. मिरज) येथील अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा बंद पडला आहे. तब्बल पाच दशके या कलाप्रकारात हुकूमत गाजविणारा हा तमाशा दुष्काळी स्थिती व आर्थिक संकटामुळे बंद ठेवण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. काळू-बाळू यांचे आजोबा सातू-हिरू यांनी तमाशाचा फड सुरु केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. ‘काळू-बाळू’ची चौथी पिढीही यातच उतरली. तसेच त्यांच्या पाचव्या पिढीनेही पुढे हीच कला जोपासली. तब्बल ५५ वर्षे तमाशा हेच दैवत मानून सांगली जिल्हा आणि कवलापूरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारा हा तमाशा गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे. कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था नियोजन करण्यासाठी किमान पंधरा लाख रुपये लागतात. गेल्या दोन वर्षापासून ही रक्कम गोळा करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आता दुष्काळी स्थितीही आहे. त्यामुळे पंधरा लाखांची व्यवस्था करणे त्यांना अशक्य झाले आहे. यंदा फडाचा मुक्काम बिसुर रस्यावरील त्यांच्या शेतात आहे.गुढीपाडव्याचा मुहूर्त साधणार? गुढीपाडव्याला तमाशा सुरु करण्याचा विचार असल्याचे तमाशा मंडळाचे संचालक संपत खाडे यांनी सांगितले.शासन तीन वर्षातून एकदा तमाशा मालकांना सहा लाखाचे अनुदान देते. यावर्षी हे अनुदान मंजूर झाले. परंतु दोनच लाख आले आहेत. हंगाम संपत असला तरी दीड महिना संधी आहे. पिढ्यान् पिढ्या हा तमाशा सुरु आहे. तो बंद होण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. तमाशा पुन्हा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महागाई वाढली आहे. डिझेलचा दर वाढला आहे. सर्व खर्चाचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे.केवळ कला टिकवून ठेवण्याची आमची धडपड आहे. - कुंदन खाडे, अंकुश ऊर्फ बाळू खांडे यांचे चिरंजीव