शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

धर्मांधतेचे विष कालवणाऱ्यांच्या मनात कालवाकालव-जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: October 17, 2016 04:23 IST

जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल.

ठाणे : जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल. कारण, ठाण्यातील मराठा मोर्चात सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा लक्षणीय सहभाग बघितल्यावर आपल्यासाठी दगड कोण उचलणार, घरे कोण जाळणार, तोडफोड कोण करणार, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहत असेल. याचे कारण अनेक वर्षांनंतर हातात भगवा घेऊन मुसलमान चालताना दिसतोय. मराठा मोर्चात कोळी, आगरी हे ठाणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी सहभागी झालेले दिसत आहेत. हेच या मराठा मोर्चाचे यश असून मराठा मोर्चाने एक वेगळी दिशा दिली असल्याचे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.ज्या मराठा मोर्चाने इतिहासाला एक वेगळी दिशा दिली, मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात एक वेगळा इतिहास लिहिला, अठरापगड जाती एकत्र केल्या, तेच मराठे आता पुन्हा तोच इतिहास लिहीत आहेत. आज परत एकदा अठरापगड जाती एकत्र येत आहेत. मदारी मेहतर नावाची पाणपोई दिसली. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आग्रा येथून महाराज निघून रायगडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा हेच मदारी मेहतर स्वत: महाराजांच्या शय्येवर झोपून राहिले. आजही त्या मदारी मेहतर यांची आठवण येते. तोच सामाजिक एकोप्याचा इतिहास पुन्हा एकदा मराठे लिहीत असल्याचेही आव्हाड म्हणाले. मराठा समाज बदलतोय, मराठे पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहीत आहेत आणि याच इतिहासावरून संपूर्ण महाराष्ट्र शिकेल आणि पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठ्यांचे हेच नेतृत्व कायम ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)