शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

धर्मांधतेचे विष कालवणाऱ्यांच्या मनात कालवाकालव-जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: October 17, 2016 04:23 IST

जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल.

ठाणे : जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल. कारण, ठाण्यातील मराठा मोर्चात सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा लक्षणीय सहभाग बघितल्यावर आपल्यासाठी दगड कोण उचलणार, घरे कोण जाळणार, तोडफोड कोण करणार, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहत असेल. याचे कारण अनेक वर्षांनंतर हातात भगवा घेऊन मुसलमान चालताना दिसतोय. मराठा मोर्चात कोळी, आगरी हे ठाणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी सहभागी झालेले दिसत आहेत. हेच या मराठा मोर्चाचे यश असून मराठा मोर्चाने एक वेगळी दिशा दिली असल्याचे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.ज्या मराठा मोर्चाने इतिहासाला एक वेगळी दिशा दिली, मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात एक वेगळा इतिहास लिहिला, अठरापगड जाती एकत्र केल्या, तेच मराठे आता पुन्हा तोच इतिहास लिहीत आहेत. आज परत एकदा अठरापगड जाती एकत्र येत आहेत. मदारी मेहतर नावाची पाणपोई दिसली. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आग्रा येथून महाराज निघून रायगडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा हेच मदारी मेहतर स्वत: महाराजांच्या शय्येवर झोपून राहिले. आजही त्या मदारी मेहतर यांची आठवण येते. तोच सामाजिक एकोप्याचा इतिहास पुन्हा एकदा मराठे लिहीत असल्याचेही आव्हाड म्हणाले. मराठा समाज बदलतोय, मराठे पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहीत आहेत आणि याच इतिहासावरून संपूर्ण महाराष्ट्र शिकेल आणि पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठ्यांचे हेच नेतृत्व कायम ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)