शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: April 11, 2016 03:06 IST

वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या जीन्स कारखान्यांना जिल्हास्तरीय दबंग नेत्याचा आशिर्वाद मिळाल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे

उल्हासनगर : वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या जीन्स कारखान्यांना जिल्हास्तरीय दबंग नेत्याचा आशिर्वाद मिळाल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पालिकेने नोटीस पाठविण्या पलिकडे कोणतीही कारवाई केली नसल्याचे उघड झाले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलेल्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखविली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ व ५ भागात ५०० पेक्षा अधिक जीन्स कारखाने आहेत. कारखान्यातील सांडपाणी थेट सोडत असल्याने उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. हरित लवादाने उल्हास नदीसह वालधूनीला प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच उल्हासनगर पालिकेसह कल्याण-डोंबिवली व अंबरनाथ पालिकेला नोटीस बजावत कोटयावधीचा दंड थोठावला होता. पालिकेने राजकीय नेत्याच्या मदतीने सरकारला साकडे घालून उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमाणी नाल्याचा प्रवाह बदण्याचे काम सुरू केले. पर्यावरण मंत्री कदम यांनी वालधूनी व उल्हास नदी प्रदूूषणाबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता कलई सेलवण, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक गेल्या महिन्यात बोलाविली होती. शहरातील शेकडो बेकायदा जीन्स कारखाने सांडपाणी थेट वालधूनी नदीत सोडत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे सांगून दहा दिवसात कारवाई करून अहवाल पाठविण्याचे आदेश कदम यांनी बैठकीत दिले होते. पालिकेने मात्र नोटीसी पलिकडे काहीही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)शहरातील भीषण पाणीटंचाईची झळ जीन्स कारखान्याला बसली नसल्याचे चित्र शहरात आहे. बहुंताश कारखान्यांकडे बेकायदा नळजोडणी असून कारखान्यात बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. यावर पालिकेचे नियंत्रण नसल्याने अमर्याद भूगर्भातून पाण्याचा उपसा होत आहे. स्थानिक राजकीय नेत्याचा हस्तक्षेप प्रमाणापेक्षा जास्त असल्याने पालिका या नळजोडण्या तोडण्याची करण्याची कारवाई करीत नाही. कारखाने होणार सील महापालिकेने ११० जीन्स कारखान्यांना कारवाई का करू नये? अशा नोटीसा दोन महिन्यांपूर्वी दिल्या आहेत. तसेच परवान्यासह इतर कागदपत्रे सादर करण्याचे बजावले आहे. मात्र कारखान्यांनी नोटीसीला केराची टोपली दाखविल्याने आयुक्तांनी पुढील आठवडयात कारखाने सील करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच कारवाई टाळायची असेल तर त्यांनी स्वखर्चाने सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारण्याचे आवाहन केले.