शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुंबईच्या विकास आराखड्याला केराची टोपली

By admin | Updated: April 21, 2015 13:27 IST

मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यमान विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून चार महिन्यात विद्यमान आराखड्यातील चुका सुधारुन नवीन आराखडा तयार करण्याचे निर्देशही राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. 
मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गेलेल्या विकास आराखड्याविरोधात असंख्य तक्रारी येत होत्या. मनसेनेही या विकास आराखड्याला प्रखर विरोध दर्शवला होता. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारने विकास आराखड्याच्या प्रश्नावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीमध्ये नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांचाही समावेश होता. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. 
समितीसमोर दोन पर्याय होते. यातील पहिला पर्याय म्हणजे विद्यमान आराखडा तसाच ठेऊन सूचना व तक्रारींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देणे हा होता. तर दुसरा पर्याय महापालिकेला नवीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देणे हा होता. समितीने यातील दुसरा पर्याय निवडला असून या समितीच्या अहवालानुसार आम्ही मुंबई महापालिकेला कलम १५४ अंतर्गत नवीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महापालिकेने विद्यमान अहवालातील त्रुटी सुधारुन चार महिन्यान नवीन आराखडा पुन्हा सादर करावा असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.