शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मुंबईच्या विकास आराखड्याला केराची टोपली

By admin | Updated: April 21, 2015 13:27 IST

मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यमान विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून चार महिन्यात विद्यमान आराखड्यातील चुका सुधारुन नवीन आराखडा तयार करण्याचे निर्देशही राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. 
मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गेलेल्या विकास आराखड्याविरोधात असंख्य तक्रारी येत होत्या. मनसेनेही या विकास आराखड्याला प्रखर विरोध दर्शवला होता. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारने विकास आराखड्याच्या प्रश्नावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीमध्ये नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांचाही समावेश होता. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. 
समितीसमोर दोन पर्याय होते. यातील पहिला पर्याय म्हणजे विद्यमान आराखडा तसाच ठेऊन सूचना व तक्रारींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देणे हा होता. तर दुसरा पर्याय महापालिकेला नवीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देणे हा होता. समितीने यातील दुसरा पर्याय निवडला असून या समितीच्या अहवालानुसार आम्ही मुंबई महापालिकेला कलम १५४ अंतर्गत नवीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महापालिकेने विद्यमान अहवालातील त्रुटी सुधारुन चार महिन्यान नवीन आराखडा पुन्हा सादर करावा असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.